AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली हिंसाचार : इशरत जहाँला जामीन मंजूर; उमर खालिदचा फैसला बाकी

दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप असलेला आणखी एक आरोपी व जवाहरलाल विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदच्या जामीन अर्जावर अजून न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. त्याच्या अर्जावर आता 21 मार्चला सुनावणी होणार असून न्यायालय त्यावेळी उमरला जामीन द्यायचा कि नाही, याचा निर्णय येणार आहे.

दिल्ली हिंसाचार : इशरत जहाँला जामीन मंजूर; उमर खालिदचा फैसला बाकी
निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळणे हा गुन्हा नाही
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 15, 2022 | 2:01 AM
Share

नवी दिल्ली : फेब्रुवारी 2020 मध्ये राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारातील आरोपी आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवक इशरत जहाँ (Isharat Jahan)ला न्यायालयाने जामीन (Bail) मंजूर केला आहे. इशरत जहाँवर दिल्लीतील हिंसाचाराच्या वेळी मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. या आरोपात इशरत जहाँ व इतर अनेक आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी इशरतला जून 2020 मध्ये लग्न करण्यासाठी दहा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे दिल्ली दंगलींमध्ये 53 निरापराधी लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. (Ishrat Jahan granted bail in Delhi violence case)

उमर खालिदच्या जामिनाचा निर्णय नाही

दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप असलेला आणखी एक आरोपी व जवाहरलाल विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदच्या जामीन अर्जावर अजून न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. त्याच्या अर्जावर आता 21 मार्चला सुनावणी होणार असून न्यायालय त्यावेळी उमरला जामीन द्यायचा कि नाही, याचा निर्णय येणार आहे. याप्रकरणी दिल्लीच्या करकरडूमा कोर्टाने सोमवारी आपला निर्णय राखून ठेवला आणि यासंबंधित सुनावणी एका आठवड्यासाठी पुढे ढकलली. ‘न्युज 18 हिंदी’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजीच न्यायालयाने उमर खालिदच्या जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. उमर खालिदच्या वकिलांनी जामीन अर्जावर न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. उमरविरुद्ध खटला सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाकडे पुरेसे पुरावे नाहीत, त्यांच्याकडे ठोस पुराव्यांचा अभाव आहे. अशा स्थितीत उमरला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयापुढे करण्यात आली. उमरच्या वतीने वकील त्रिदीप पेस यांनी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, उमरला शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारचा एकही पुरावा फिर्यादीकडे नाही.

पोलिसांनी केले होते गंभीर आरोप

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी उमर खालिद तसेच इतर सहा जणांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. राजधानी दिल्लीत 2020 च्या दंगलीत हिंसाचार भडकवण्याचा आणि पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप त्या आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या खटल्यातील मुख्य सूत्रधारांनी भीम आर्मी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते कपिल मिश्रा यांना दोषी ठरवले जावे, यादृष्टीने प्रयत्न केल्याचेही फिर्यादीने न्यायालयाला सांगितले आहे. दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने सरकारी आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि उमरच्या जामीन अर्जावरील निर्णय आठवडाभरासाठी पुढे ढकलला. (Ishrat Jahan granted bail in Delhi violence case)

इतर बातम्या

‘स्किन टू स्किन टच’चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर; राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला

Hijab Contro : हिजाब वादाचा कर्नाटक हायकोर्टात उद्या फैसला; विधानसभेतही होणार चर्चा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली