AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या हृदयाचे मंदिर झाले पाहिजे, तरच सुख आणि शांती नांदेल, इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांचे मत

मुंबईतील बंगाली बांधवाच्या दुर्गा पूजा उत्साहाला सुरुवात झाली आहे. माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या सभागृहात ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 12 ऑक्टोबरपर्यंत तो चालणार आहे.

आपल्या हृदयाचे मंदिर झाले पाहिजे, तरच सुख आणि शांती नांदेल, इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांचे मत
| Updated on: Oct 09, 2024 | 9:15 PM
Share

गरजा कधीच संपत नाहीत, प्रत्येकाला नंबर वन व्हायचे आहे. माणसाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात त्याला मिळणारे जीवन यात अंतर असल्याने माणसाला नैराश्याने घेरले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयात मंदिर बांधवे, दुसऱ्याला मदत करावी तरच खरे समाधान सुख आणि शांती मिळेल असे इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांनी भगवतगीतेवरील आपल्या प्रवचनात सांगितले. ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्यावतीने माटुंगा येथील एसएनडीटी कॉलेजातील सभागृहात आयोजित दुर्गा महोत्सवात गौरंग दास प्रभुजी यांचे भगवतगीतेवर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.

अहंकारामुळे दुर्योधनाचा विनाश झाला. दुर्योधन चांगल्या कारणासाठी लढला नाही. व्यक्तीने अहंकारावर मात करायला हवी. आपणच नंबर वन असायला हवे आपल्याखेरीज दुसरे कोणी असूच नये अशी महत्वाकांक्षा जगाला विनाशाकडे नेत आहे. दुर्याधनाला कुरुक्षेत्राच्या उन्हातही डोक्यावर छत्र धरणाराही कोणी नको होता. कारण त्याला आपल्या पेक्षा कोणी मोठे होतेय याची सतत भीती वाटायची. प्रत्येकाने अहंकारावर मात केली आणि हृदयाला आणि घराला मंदिर केले तर सुख आणि शांती नांदेल असेही गौरंग दास प्रभुजी यावेळी म्हणाले.मुंबईतील बंगाली लोकांच्या दुर्गा पूजा महोत्सवाचे उद्घाटन इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांच्या हस्ते माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी होईचोई आनंदो फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजीत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संदीपान आणि टीव्ही 9 नेटवर्कच्या डिस्ट्रीब्यूशन डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट धीरेंद्र सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

मुंबईतील बंगाली बांधवाचा उत्साह

मुंबईतील बंगाली बांधव मुंबईत मोठ्या उत्साहाने दुर्गा पूजा साजरी करीत असतात. ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील मांटुगा येथे दुर्गापूजेचा महोत्सव सुरु झाला आहे. 9 ते 12 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.महाराष्ट्रातील गणेशोत्सवा प्रमाणे बंगालमध्ये दुर्गा पूजा केली जाते. महाराष्ट्रात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी घटस्थापना झाली. परंतू बंगाली लोक शारदीय नवरात्री सहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल षष्ठी तिथि (महा षष्ठी) दुर्गा पूजा सुरु करत असतात.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.