Israel Iran War : इराणमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज, सर्वात मोठा प्रश्न निकाली, संपूर्ण जग बघत राहिलं

गेल्या काही दिवसंपासून मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाचा परिणाम हा केवळ अमेरिका, इराण आणि इस्त्रायल या तीनच देशांवर झाला नसून, अनेक देशांना मोठा फटका बसला आहे.

Israel Iran War : इराणमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज, सर्वात मोठा प्रश्न निकाली, संपूर्ण जग बघत राहिलं
crude oil carrier
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 6:49 PM

गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यापैकी तब्बल 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. हा मार्ग इराणने बंद केल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे . भारतात सध्या अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची टंचाई जाणवत असून, सिलिंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तसेच हॉटेलमध्ये देखील सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं हॉटेलचालकांवर देखील हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र आता भारतासाठी एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारताचं विशालकाय गॅस टँकर VLGC शिवालिक होर्मुज स्ट्रेट मध्ये अडकून पडलं होतं ते आता सुरक्षितरित्या बाहेर पडलं आहे. न्यूज 18 च्या एका रिपोर्टनुसार हे जहाज तब्बल 40,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन भारतात येत आहे. या गॅसच्या साठ्यामुळे भारतातील गॅसचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. भारतीय नौदलाच्या निगराणीमध्ये हे जहाज सध्या भारताच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. भारताचा झेंडा असलेल्या या जहाजाला या मार्गाने जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. हा भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे.

जभरात इंधन टंचाई

इराणकडून होर्मुज स्ट्रेट बंद करण्यात आलं आहे. होर्मुज स्ट्रेट बंद झाल्यामुळे जगातील अनेक देशांना सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. भारतामध्ये गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले आहेत. तर पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान आणखी काही दिवस हे युद्ध असचं सुरू राहिलं तर जग एका मोठा संकटात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतामध्ये देखील मोठी इंधन टंचाईन निर्माण झाली आहे.

Follow Us