
Jagdeep Dhankhar big statements : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बुधवारी एक मोठं वक्तव्य केलं. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार राम सिंह कसवा आणि आमदार रही कमला कसवा यांच्या घरी ते गेले होते. त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील एका व्यक्तीने त्यांना, चांगलं झालं तुम्ही दाढी ठेवली नाही असे म्हटलं. त्यानं असं म्हणायची वेळ की धनखड यांनी त्यावर जोरदार वाक्य टाकलं आणि आज ते वाक्य माध्यमांमध्ये गाजत आहे. धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. आरोग्याचं कारण त्यासाठी देण्यात येत होतं. पण या वादावर कधीच पडदा पडला नाही. त्यांनी राजीनामा दबावात दिल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला होता. तर त्यांनी इतक्या झटपट राजीनामा का दिला ही गुपित सत्य कायम चर्चेत आहे. पण ते कधी समोर आलेले नाही. धनखड यांनी याविषयीची अधिकृत भूमिका कधीही मांडली नाही.
दाढीवाल्यांची मला भीती
जगदीप धनखड म्हणाले की दाढीवाल्यांची मला भीती वाटते. दाढीवाला दिसला की मी घाबरून जातो. माझा ओएसडी पण त्याच्या दाढीने मला घाबरवतो, त्यांनी हसत हसत हा संवाद साधला असला तरी त्याची मोठी चर्चा होत आहे. आता धनखड यांनी मनातील सल बोलून दाखवली की खरंच ते हस्यविनोद करत होते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण या त्यांच्या विधानावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची माध्यमात एकच चर्चा रंगली आहे. लोक आता त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तुफान कमेंट्स करत आहेत. त्यांच्या विधानावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
राजकीय तंबूत तुफान चर्चा
मला दाढीवाल्यांची भीती वाटते हे वक्तव्य आता राजकीय तंबूत हस्यविनोदासाठीच नाहीतर चिमटा काढण्यासाठी वापरले जात आहे. राजस्थानपासून ते दिल्लीपर्यंत दाढीवाल्यांची एकच चर्चा सुरू आहे. त्यांचे हे वक्तव्य साधारण मानले जात नाही. जगदीप धनखड यांना काय सुचवायचंय हे लोकांना माहिती आहे. त्यांनी नेमकी नस पकडली याची राजकारणात चर्चा सुरू आहे. त्यांनी दाढीवाल्याच्या आडून कुणावर निशाणा साधला याची चर्चा रंगली आहे. धनखड यांनी होळीपूर्वची धुळवड उडवल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
तर विरोधी खेम्यात धनखड यांच्या वक्तव्याने गुदगुल्या झाल्या आहेत. त्यांना तर आयते कोलीत मिळाले आहे. दाढीवाल्यांची इतकी भीती धनखड यांना कधीपासून वाटू लागली आहे, असा चिमटा विरोधी गोटातून विचारला जात आहे. हा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे समजते. त्यांच्या दाढीवाल्याची भीती हे वक्तव्य दिल्लीतही गाजत असल्याचे समजते.