जेव्हा काँग्रेस नेत्याला अजित डोवालच्या मुलाची माफी मागावी लागली

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval ) यांचा मुलगा विवेक डोवाल (Vivek Doval) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनीही जयराम रमेश यांनी मागितलेल्या माफीला स्वीकारले आहे. (Jairam Ramesh apologize son of Ajit Doval in defamation case) […]

जेव्हा काँग्रेस नेत्याला अजित डोवालच्या मुलाची माफी मागावी लागली
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 5:11 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval ) यांचा मुलगा विवेक डोवाल (Vivek Doval) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनीही जयराम रमेश यांनी मागितलेल्या माफीला स्वीकारले आहे. (Jairam Ramesh apologize son of Ajit Doval in defamation case)

नेमके प्रकरण काय ?

जयराम रमेश यांनी एका मासिकात छापून आलेल्या लेखाचा आधार घेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोवाल यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. त्याविरोधात विवेक डोवाल यांनी जयराम रमेश तसेच एका मासिकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. यामध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पित्याची बदनामी केली जात असल्याचा आरोप विवेक डोवाल यांनी केला होता.

जयराम रमेश यांचं म्हणणं काय?

विवेक डोवाल यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “त्या वेळी निवडणुका चालू होत्या. विवेक डोवाल यांच्याविरोधात मी रागाच्या भरात वक्तव्य केले होते,” असे जयराम रमेश यांनी सांगितलं.

तसेच, विवेक डोभाल यांच्याविरोधात मी उत्साहात येऊन वक्तव्य केले. काहीही टिप्पणी करण्यापूर्वी मी त्या लेखाचा अभ्यास करायला हवा होता,” असेही जयराम रमेश म्हणाले.

विवेक डोवाल यांनी मोठ्या मनाने माफी स्वीकारली

जयराम रमेश यांनी केलेल्या टिप्पणीमुळे अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल यांनी जयराम रमेश यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. हा खटला अजूनही सुरु होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी उत्साहात येऊन मी ते वक्तव्य केले असल्याचे सांगत विवेक यांची माफी मागितली. त्यानंतर विवेक डोवाल यांनी जयराम रमेश यांच्यावरोधात केलेली अब्रुनुकसानीची तक्रार मागे घेत जयराम रमेश यांची माफी स्वीकारली आहे. तसेच, या वादावर आता पडदा पाडला आहे.

दरम्यान, जयराम रमेश यांच्याविरोधात तक्रार असल्यामुळे लोकप्रतिनिधींशी संबंधित खटल्यांवरील सुनावणीसाठी असलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी केली जात होती. मात्र, जयराम रमेश यांनी माफी मागितल्यानंतर आता हा खटला फक्त त्या मासिकाविरोधातच चालवला जाईल. यापुढे या खटल्याची सुनावणी आता सामान्य न्यायालयासमोर होईल.

संबंधित बातम्या :

बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

पीएम केअर फंडात जवानांनी किती पैसे दिले ? वाचा हा रिपोर्ट

Reservation: आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं भाष्य

(Jairam Ramesh apologize son of Ajit Doval in defamation case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.