AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnath Singh : नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण त्यांना एका माणसाने अडवलं, राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना बाबरी मशीद आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यावरुन आज मोठा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. संसदेच हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या दरम्यानच राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Rajnath Singh : नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची  होती, पण त्यांना एका माणसाने अडवलं, राजनाथ सिंह यांचा मोठा दावा
Rajnath Singh
| Updated on: Dec 03, 2025 | 9:37 AM
Share

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलय. पंडित जवाहरलाल नेहरुंना जनतेच्या पैशाने पुन्हा बाबरी मशीद बनवायची होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. म्हणूनच बाबरी मशीद पुन्हा उभी राहू शकली नाही असं राजनाथ सिंह म्हणाले. ते गुजरातच्या बडोदा शहरात बोलत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरातच्या सडली गावात आयोजित एका युनिटी मार्चच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. “आज आपण ज्या महापुरूषाचं 150 जयंती वर्ष साजर करत आहोत, ते भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधणारे नायक आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचं निर्णायक नेतृत्व यासाठी देश त्यांना नेहमी लक्षात ठेवेल” असं राजनाथ सिंह म्हणाले.

“नेहरु यांनी पब्लिक फंडातून बाबरी मशीद बांधण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी सरदार पटेल यांनी या योजनेला स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी सरदार पटेल यांनी सरकारी पैशाने बाबरी मशीद बांधू दिली नाही. त्यानंतर नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सरदार पटेल यांनी हा वेगळा विषय आहे, असं उत्तर दिलेलं” असं राजनाथ सिंह म्हणाले. तिथे 30 लाख रुपये जनतेने दान केलेले. ट्रस्ट बनवण्यात आली. या कामात एकाही सरकारी पैशाची गरज लागली नाही.

त्यांचा वारसा दडपण्याचा प्रयत्न झाला

“पटेल यांच्या निधनानंतर जो पैसा जमा झालेला, तो नेहरु यांनी विहिरी आणि रस्ते बनवण्यासाठी खर्च करावा असा सल्ला दिलेला. त्यांचा वारसा दडपण्याचा प्रयत्न झाला. पटेल खऱ्या अर्थाने उदार आणि निष्पक्ष नेते होते. त्यांनी कधीच तृष्टीकरणाचं राजकारण केलं नाही” असे दावे राजनाथ सिंह यांनी केले. “1946 साली अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेहरु यांना अधिक मते मिळाली. पण गांधीजींच्या सांगण्यावरुन पटेल यांनी आपलं नाव मागे घेतलं आणि नेहरु अध्यक्ष झाले. त्यानंतर ते पंतप्रधान बनले” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.