AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षांचा वनवास पूर्ण, न्यायालयाच्या आदेशानुसार ‘या’ प्रभू रामाचीही पोलीस ठाण्यातून सुटका

रुरा शहरातील बाजारपेठेत बांधलेल्या मंदिरामधून राम आणि लक्ष्मण या दोन्ही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांचा छडा लावून या मूर्ती पोलिसांनी पोलीस स्थानकात 11 वर्षे ठेवल्या होत्या.

11 वर्षांचा वनवास पूर्ण, न्यायालयाच्या आदेशानुसार  'या' प्रभू रामाचीही पोलीस ठाण्यातून सुटका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 13, 2022 | 7:43 PM
Share

नवी दिल्लीः मर्याद पुरुषोत्तम भगवान श्री राम यांनी त्रेतायुगात 14 वर्षे वनवास भोगला होता. तर कलियुगातील प्रभूंना 11 वर्षे पोलीस ठाण्यात राहावे लागले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे. येथील भगवान राम, लक्ष्मण आणि माता जानकी यांनाही येथे 11 वर्षांचा वनवास भोगावा लागला आहे. मंदिरातील तीन मूर्ती चोरट्यांनी चोरून पळवून घेऊन गेले होते. या मूर्ती चोरट्यांकडून जप्त केल्यानंतर एका पदार्थात ठेवल्या होत्या असंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण निकाली काढल्यानंतर या मूर्ती आता शुक्रवारी मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

वास्तविक, हे गाव अयोध्येपासून सुमारे 300 किमी अंतरावर असून कानपूर ग्रामीण भागातील रुरा पोलीस ठाण्यापासूनही लांब असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पोलीस स्थानकातून आता प्रभू श्री राम, माता जानकी आणि लक्ष्मण यांची 11 वर्षांनंतर पोलीस स्थानकातून सोडून देण्यात आले आहे.

रुरा शहरातील बाजारपेठेत बांधलेल्या मंदिरामधून राम आणि लक्ष्मण या दोन्ही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांचा छडा लावून या मूर्ती पोलिसांनी पोलीस स्थानकात ठेवण्यात आल्या होत्या.

तर त्यानंतर 11 वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातून या मूर्ती मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मंदिरात इतर देवदेवतांची पूजा केली जात होती.

मात्र रामाचा दरबार रिकामा होता असंही येथील पुजारी सांगतात. त्यामुळे मूर्ती आता मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याने येथील नागरिकांनी आता आनंद व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातील रुरा टाउन मार्केटमध्ये राहणारे किराणा दुकानदार, राजेश आणि राम बाबू यांनी 1964 हे मंदिर बांधले होते. त्यामध्ये राम, सीता आणि अष्टधातूतील लक्ष्मण यांच्या मूर्तींसोबतच इतर देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2011 मध्ये चोरट्यांनी मंदिरातून अष्टधातूपासून बनवलेल्या राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...