AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

B Nagendra : कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित 89 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ
B Nagendra resignImage Credit source: Google
| Updated on: Aug 28, 2026 | 8:54 PM
Share

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकमधून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित 89 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. रायचूर ते बेल्लारी अशी भाजपची 10 दिवसांची पदयात्रा सुरू होण्याच्या अगोदरच नागेंद्र यांनी राजीनामा दिल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

राजीनाम्यानंतर भाजपवर गंभीर आरोप

राजीनामा देताना बी. नागेंद्र यांनी मनुवाद्यांनी आपल्याला लक्ष्य केले असा गंभीर आरोप केला. आदिवासी समाजातील व्यक्तीने पुढे जाऊ नये, अशी काही लोकांची इच्छा असल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. भाजपवरही निशाणा साधत ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून मला घाबरवता येणार नाही असे नागेंद्र यांनी म्हटले.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिले होते संकेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारीच बी. नागेंद्र आपल्या मंत्रिपदाबाबत लवकरच मोठा निर्णय घेतील, असे संकेत दिले होते. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी सांगितले की, नागेंद्र यांनी सकाळी त्यांच्याशी चर्चा केली असून लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नागेंद्र यांनी स्वतःला काँग्रेसचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्याचे सांगितले असून पक्षाचा निर्णय मान्य करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले होते.

यापूर्वीही दिला होता राजीनामा

वाल्मीकी महामंडळातील निधी कथितरीत्या वळवल्याच्या आरोपांनंतर बी. नागेंद्र यांनी यापूर्वीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तपास सुरू असतानाच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने विरोधकांनी कर्नाटक सरकारवर सातत्याने निशाणा साधला होता. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नागेंद्र यांचा राजीनामा अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाबाबत सुमारे दहा दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच काँग्रेस सरकार वारंवार स्वतःला अशा राजकीय संकटात का ढकलते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता नागेंद्र यांच्या जागी कोणत्या नेत्याची मंत्रि‍पदी वर्णी लागले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस, सदावर्तेंचा आरोप
Gunratna Sadavarte on Manoj Jarange :  मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस; सदावर्तेंचा आरोप, उपोषणापूर्वीच अटकेची मागणी
एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन,
Manoj Jarange : एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन, मुंबईतही...
साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
Milk Price : साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती...
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती रुपयांनी घट  झाली?
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा...
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी..
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच... काय घडलं?
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचं मोठं विधान
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र;
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र; संदीप वाघेरेंच्या बॅनरची तुफान चर्चा
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक