AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा
रेल रोको
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 11:46 AM
Share

Kisan Rail Roko Andolan नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने आज रेल रोको आंदोलन जाहीर केले आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. जोपर्यंत लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चानं दिला आहे. आम्हाला ट्रेन कुठे थांबवायची आहे हे माहिती आहे, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. भारत सरकारकडून आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असं टिकैत म्हणाले.

संयुक्त किसान मोर्चानं रेल रोको आंदोलनादरम्यान आज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व मार्गांवर सहा तास रेल्वे रोको करणार असल्याचं सांगितलं आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडात न्याय मिळावा म्हणून संयुक्त राज्य किसान मोर्चाने गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक आणि बडतर्फ करण्याची मागणी करत देशव्यापी रेल रोको कार्यक्रम जाहीर केला आहे.

..तर शेतकऱ्यांवर रासुका अंतर्गत कारवाई करणार

लखीमपूर खेरी प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाकडून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यूपी, हरियाणा आणि पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर शेतकऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे लखनऊ पोलिसांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर रासुका लावला जाईल, असं लखनऊ पोलिसांनी म्हटलं आहे.

रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी संघटनांच्या रेल रोको आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको करण्यात येईल. आम्हाला ट्रेन कुठे थांबवायची आहे हे माहिती आहे, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. भारत सरकारकडून आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असं टिकैत म्हणाले.

इतर बातम्या:

Chhagan Bhujbal | मुंडे बहीण- भावाचा कलगीतुरा थांबेल – छगन भुजबळ

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय?, भुजबळ म्हणाले, अहं हं हं… ना ना ना…; मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत!

Kisan Rail Roko Andolan Live updates SKM demand union minister Ajay mishra resignation and Arrest started protest at UP Haryana Punjab over Lakhimpur Kheri Violence

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.