AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुल्लूत पर्यटकांवर दरड कोसळली, तीन ते चार गाड्यांचा चक्काचूर, सहा जण ठार

हिमाचल प्रदेशातील भूस्खलनामुळे कुल्लू ते मणिकर्ण अशा रस्त्यावर माती आणि दगडांचा मोठा ढीगारा साचला आहे आणि त्यामुळे वाहतूकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

कुल्लूत पर्यटकांवर दरड कोसळली, तीन ते चार गाड्यांचा चक्काचूर, सहा जण ठार
| Updated on: Mar 30, 2025 | 10:33 PM
Share

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मणिकर्ण येथे गुरुद्वाराजवळ भूस्खंलन होऊन ढीगाऱ्या खाली सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.गुरुद्वाराजवळ एक झाड पडल्याने हे सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दुर्घटनेच्या वेळी हे सर्व लोक रस्त्याच्याकडेला एका झाडा खाली बसले होते.

अचानक दरड कोसळल्याने डोंगरावरुन आलेला माती आणि दगडांचा ढीगारा झाडावर आदळला. त्या वजनाने झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. यामुळे त्या झाडाखाली बसलेले लोक चेंगरले गेले. अधिकृतरित्या मिळालेल्या माहीतीनुसार या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला स्टॉल चालविणाऱ्याचा मृत्यू झाला. तर सुमो कारमध्ये बसलेल्या दोन लोकांसह तीन पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहीती समजताच पोलीसांनी सर्व सहा लोकाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे.

कुल्लूत पर्यटकांवर संकट

या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य संपले आहे. लॅण्ड स्लाईडमुळे एका मोठे झाड उखडून रस्त्यावर पडल्याने या झाडाखाली येऊन चार तीन ते चार गाड्यांचा चक्काचूर झाला. यात बसलेले पर्यटकांसह स्थानिक लोक गंभीर जखमी झाले त्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे एडीएम कुल्लू अश्वनी कुमार यांनी सांगितले आहे.

ढिगाऱ्यात बचाव मोहीम सुरू

या वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात नेले आहे. जिथे डॉक्टरांनी तपासून सहा जणांना मृत घोषीत केले. काही लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली आहे. या भूस्खलनामुळे कुल्लू ते मणिकर्णला जोडणाऱ्या रस्त्यावर माती आणि दगडांचा मोठा ढीगारा साचला आहे आणि त्यामुळे वाहतूकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती पाहून पोलिसांनी मणिकर्ण आधी वाहतूक वळवली आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....