AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा खलनायक, ज्याने एका सीनसाठी 50 दिवस केली नाही अंघोळ, वास येऊ नये म्हणून परफ्युम मारायचा, ज्याच्या पुढे 14 सुपरस्टार ठरले फेल

बॉलिवूडचा असा एक खलनायक ज्याने एका सीनसाठी तब्बल 50 दिवस केली नव्हती अंघोळ. सेटवर वास येऊ नये म्हणून मारायचा परफ्युमचा. रिलीज होताच चित्रपट ठरला सुपरहिट.

असा खलनायक, ज्याने एका सीनसाठी 50 दिवस केली नाही अंघोळ, वास येऊ नये म्हणून परफ्युम मारायचा, ज्याच्या पुढे 14 सुपरस्टार ठरले फेल
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 15, 2026 | 10:21 AM
Share

Bollywood Movies : हिंदी चित्रपटसृष्टीत जितका नायक महत्त्वाचा असतो तितकाच प्रभावी खलनायकही आवश्यक असतो. नायकाच्या धैर्याची आणि ताकदीची खरी कसोटी तेव्हाच लागते जेव्हा त्याच्यासमोर उभा असलेला खलनायक अंगावर काटा आणणारा असतो. बॉलिवूडमध्ये अमजद खान यांनी साकारलेला ‘गब्बर’, अमरीश पुरी यांचा ‘मोगॅम्बो’, तसेच प्राण, डैनी डेन्जोंगपा आणि गुलशन ग्रोवर यांसारख्या कलाकारांनी खलनायकाच्या भूमिकेतून इतिहास घडवला आहे. विशेषतः शोले मधील गब्बर आजही सर्वात भयानक खलनायकांपैकी एक मानला जातो. मात्र 1998 साली आलेल्या एका चित्रपटात असा खलनायक पाहायला मिळाला ज्याने तब्बल 14 सुपरस्टार्सवर एकहाती छाप टाकली.

27 नोव्हेंबर 1998 रोजी प्रदर्शित झालेला ‘चाइना गेट’ हा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा मल्टिस्टारर चित्रपट होता. या चित्रपटात एकूण 15 दिग्गज कलाकार झळकले होते. यात अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, डैनी डेन्जोंगपा, ओम पुरी, परेश रावल, कुलभूषण खरबंदा, टीनू आनंद, अनुपम खेर, ममता कुलकर्णी आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.

इतक्या मोठ्या स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांच्या मनावर सर्वाधिक दहशत निर्माण करणारे पात्र म्हणजे डाकू ‘जगीरा’. ही भूमिका अभिनेता मुकेश तिवारी यांनी साकारली होती. जगीराच्या एंट्रीपासूनच त्याचा खौफ पडद्यावर जाणवत होता. अनेक प्रेक्षकांना त्याचा अभिनय पाहून गब्बरची आठवण झाली. मात्र जगीराची क्रूरता आणि सादरीकरणाची शैली पूर्णपणे वेगळी होती.

मुंबईला जाण्यासाठीही नव्हते पैसे

या भूमिकेमागची कहाणी तितकीच रोचक आहे. मुकेश तिवारी यांना या चित्रपटासाठी कॉल आला तेव्हा त्यांच्या जवळ मुंबईला जाण्यासाठीही पैसे नव्हते. मित्राच्या मदतीने ते ऑडिशनसाठी पोहोचले. भूमिकेत पूर्णपणे रस आणि खरा वाटण्यासाठी त्यांनी तब्बल 50 दिवस अंघोळ केली नव्हती, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने रानटी आणि धोकादायक डाकूसारखे दिसावेत. सेटवर दुर्गंधी टाळण्यासाठी परफ्युमचा वापर केला जात होता. इतकेच नाही तर त्यांच्या लूक आणि वासामुळे शूटिंगदरम्यान घोडाही बेकाबू झाल्याची चर्चा आहे.

गाणी आणि बॉक्स ऑफिस

या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. तसेच जगीराचा डायलॉग ‘मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुमारे 9.25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22.30 कोटी रुपयांची कमाई केली होती.