AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण…

महागाई इतकी वाढली आहे की स्वयंपाकघरापासून दरवाढीला सुरुवात झाली. आता तर ही दरवाढ बाथरुमपर्यंत पोहोचली आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे साबणाचे दर वाढले आहेत.

महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण...
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 3:49 PM
Share

रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला अधिक खर्च असतो. दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे.

साबणाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ

स्वयंपाक घरानंतर म्हणजे स्वयंपाकाचे तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळे यांच्यापाठोपाठ महागाई बाथरूमकडे सरकली आहे. ही काही गंमतीशीर गोष्ट नाही. चालू तिमाहीत आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ज्या पाम तेलापासून साबण तयार केला जातो. त्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साबणाच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे. ज्यामुळे देशातील FMCJ कंपन्यांनी आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत वाढ केली आहे.

किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या

दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे. अनियमित हवामानामुळे उत्पादन घटल्याने HUL आणि टाटा कन्झ्युमर सारख्या कंपन्यांनीही अलीकडे चहाच्या दरात वाढ केली आहे.

सप्टेंबर तिमाहीच्या निकालादरम्यान अनेक सूचीबद्ध कंपन्यांनी आपले मार्जिन वाचविण्यासाठी चालू तिमाहीत साबणाच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोकोच्या किंमतीतही वाढ होत आहे.

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ

विप्रो कन्झ्युमर केअरचे सीईओ नीरज खत्री म्हणाले, ‘साबण निर्मितीतील प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात 30 हून अधिक वाढ झाली आहे. परिणामी, सर्व प्रमुख कंपन्यांनी ही वाढ अंशत: भरून काढण्यासाठी सुमारे 7 ते 8 टक्क्यांनी किंमती वाढवल्या आहेत. अझीम प्रेमजी यांच्या विप्रो एंटरप्रायझेसचे युनिट असलेल्या विप्रोकडे संतूरसारख्या ब्रँडचा मालक आहे.

देशातील सर्वात मोठी FMCJ कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनेही चहा आणि स्किन क्लिंजर उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये डव्ह, लक्स, लाईटबॉय, लिरिल, पियर्स, रेक्सोना आदी ब्रँडअंतर्गत साबणाच्या व्यवसायाचा समावेश आहे. आयात शुल्कवाढीसह जागतिक किमती वाढल्याने सप्टेंबरच्या मध्यापासून पाम तेलाच्या किंमती तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पाम तेल कुठून आयात केले जाते?

पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात केले जाते. सध्या पाम तेलाचा दर 1370 रुपये प्रति 10 किलो आहे. याशिवाय HUL च्या इतर पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या किमतीही वाढल्या आहेत, अशी माहिती एका वितरकाने दिली.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे कार्यकारी संचालक अबनीश रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचयूएलनंतर आता बहुतांश कंपन्या किंमती वाढवणार आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.