AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना वाजपेयी, ना आडवणी, या दोघांनी भाजपसाठी १९८४ मध्ये मिळवला विजय

Lok Sabha Election 2024:१९८४ मध्ये गुजरातमधील मेहसाणा लोकसभा मतदार संघातून डॉ. ए.के. पटेल आणि आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदार संघातून चंदूपतला जंगा रेड्डी विजयी झाले होते. मेहसाणामध्ये १९८० मध्ये काँग्रेसचे मोतीभाई चौधरी विजयी झाले होते. परंतु १९८४ मध्ये काँग्रेसची लाट असताना त्यांचा पराभव झाला.

ना वाजपेयी, ना आडवणी, या दोघांनी भाजपसाठी १९८४ मध्ये मिळवला विजय
1984 मध्ये भाजपचे दोन सदस्य होते. त्यात वाजपेयी किंवा आडवणी नव्हते.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 20, 2024 | 1:11 PM
Share

भाजपने आता ४०० पारचा नारा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजपला पूर्ण सत्ता मिळाली आहे. भाजपची ही वाटचाल २ सदस्यांवरुन सुरु झाली होती. १९८४ मध्ये काँग्रेसची लाट असताना भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यावेळी ना अटलबिहारी वाजपेयी, ना लालकृष्ण आडवाणी निवडून आले होते. निवडून आलेले डॉ. ए.के. पटेल आणि चंदूपतला जंगा रेड्डी हे होते. त्यावेळी भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवत नव्हते. त्यानंतर १९८९ मध्ये भाजपने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. तसेच हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला. मग लोकसभेत दोन सदस्यावरुन ८५ सदस्यांवर भाजप पोहचली. १९९१ मध्ये राम मंदिर निर्माणसाठी आंदोलन झाले. त्यानंतर भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या १२० वर गेली. १९९६ मध्ये लोकसभेत भाजपचे १६१ सदस्य झाले. १९९८ मध्ये १८२ जागांवर भाजपला यश मिळाले. २००४ आणि २००९ मध्ये भाजपचा आकडा कमी झाला. परंतु २०१४ मध्ये मोदी फॅक्टरमुळे भाजप २८२ जागांवर जाऊन पोहचले. २०१९ मध्ये भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. आता २००४ मध्ये ४०० पार जाणार का? हे ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

१९८४ मध्ये कोण निवडून आले होते

१९८४ मध्ये गुजरातमधील मेहसाणा लोकसभा मतदार संघातून डॉ. ए.के. पटेल आणि आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदार संघातून चंदूपतला जंगा रेड्डी विजयी झाले होते. मेहसाणामध्ये १९८० मध्ये काँग्रेसचे मोतीभाई चौधरी विजयी झाले होते. परंतु १९८४ मध्ये काँग्रेसची लाट असताना त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पटेल यांना कोणी पराभूत करु शकले नाही. तसेच मोतीभाई चौधरी ज्या हनमकोंडा जागेवरुन विजयी झाले होते, त्याठिकाणी प्रथमच भाजपचा विजय झाला. त्यापूर्वी ही जागा तेलगू देसम पार्टी आणि काँग्रेसकडे होती.

भाजपचे १९८४ मध्ये विजयी झालेले दोन्ही सदस्य

दक्षिण भारतात १९८४ मध्येच कमळ

भाजपला उत्तर भारतीयांचा पक्ष म्हटला जातो. भाजप अजून दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करु शकला नाही. परंतु १९८४ मध्ये भाजपला ज्या दोन जागांवर विजय मिळवला होतो, त्यात एक जागा दक्षिण भारतातील होती. आंध्र प्रदेशामधील हनमकोंडा येथून चंदुपतला रेड्डी विजयी झाले होते. १९८४ नंतर भाजपचा या लोकसभा मतदार संघात पराभव झाला होता. १९८९ आणि १९९६ मध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. १९९८ मध्ये तेलगू देसम पक्षाचा विजय झाला. त्यानंतर २००४ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचा उमेदवार विजयी झाला.

दुसरीकडे गुजरातमधील मेहसाणा येथे भाजपचा दबदबा कायम राहिला. अपवाद १९९९ मधील निवडणुकीच्या वेळी राहिला. त्यावेळी काँग्रेसचे आत्माराम पटेल यांनी विजय मिळवला होता. परंतु २००२ मध्ये पुन्हा या ठिकाणी भाजप उमेदवाराला विजय मिळला. परंतु २००४ मध्ये पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. २००९ पासून सातत्याने भाजपचा या ठिकाणी विजय होत आहे. सध्या श्रद्धाबेन पटेल खासदार आहेत.

Follow Us
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले