AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, रात्रीतून 14 मृत्यू, 40 गंभीर, मध्य प्रदेशात काय घडलं?

मध्य प्रदेशातील रीवा जवळ ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडली

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, रात्रीतून 14 मृत्यू, 40 गंभीर, मध्य प्रदेशात काय घडलं?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 22, 2022 | 9:36 AM
Share

भोपाळः दिवाळी (Diwali) आल्याने गावापासून दूर राहणारे अनेक कामगार आणि नोकरदार आता गावी परतू लागलेत. मात्र अशाच गावी परतणाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात (Accident) झालाय. यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रीवा जवळील राष्ट्रीय महामार्ग-30 वर एका खासगी बसला हा अपघात झाला. बसमधील 14 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 40 प्रवासी जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे, घटना झाली तेव्हा जखमी लोकांच्या ओरडण्याने वेदनादायी किंचाळ्यांनी परिसराला भयाण वातावरण आलं होतं.

शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रीवा परिसरातील पहाड घाटात हा अपघात झाला. हैदराबाद येथील सिकंदराबाद येथील प्रवाशांना घेऊन ही बस उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाली होती. रीवा परिसरातील सोहागी घाट परिसरात हा अपघात झाला. एका माहितीनुसार, या बसमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी होते.

राष्ट्रीय महामार्ग-30 वरील घाटातून उतरताना बसला अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की बसच्या केबिनमध्येच 3-4 लोक अडकले.

अपघाताचं नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार, समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाशी बसची धडक होत होती.

समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागून वेगाने येणारी बस थेट या वाहनावर आदळली. बस वाहनावर चढल्याने बसच्या केबिनमध्ये बसलेल्या लोकांसह सीटवर बसलेल्या काहींचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यावरील इतर प्रवाशांनी या अपघाताची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. सोहागी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्यांना मोठ्या शर्थीनं बाहेर काढण्यात आलं.

अपघातात अजूनही अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या अपघातासंबंधी ट्विट केलंय. हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून यातील मृत्यूची घटना दुःखदायक, वेदनादायक असल्याचं त्यांनी लिहिलंय.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत