AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बघताय काय आश्चर्यानं, दीड वर्षाच्या मुलासाठी वाघाला मात दिलीय माऊलीनं…

उमरिया जिल्ह्यातलं बांधवगड टायगर रिझर्व्हचा भाग आहे. त्यामुळे इथे हिंस्र पशुंचा नेहमीच वावर असतो. भूक लागली की जनावरांवर हल्ले होतात. रविवारी माणसांवर हल्ला झाला.

बघताय काय आश्चर्यानं, दीड वर्षाच्या मुलासाठी वाघाला मात दिलीय माऊलीनं...
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 10:38 AM
Share

उमरीया (म.प्र): पोटच्या पोराला सोडवण्यासाठी तिनं खरच वाघाच्या जबड्यात हात घातला. दीड वर्षाच्या राजवीरवर वाघानं झडप घातली. तशी माऊलीत अचानक शक्ती संचारल्यागत झालं. थेट भिडली. जिवाच्या आकांतानं किंचाळू लागली. गावकरी आले. डोळ्यासमोरचं चित्र श्वास थांबवणारं होतं. वाघानं जवळपास दोघांनाही कवेत घेतलं होतं. आईच्या मानेत नखं खुपसली होती. पण तिचा टाहो इतका भयंकर सुरु होता की त्या आवाजानं वाघाचंही मस्तक खवळलं होतं.

मध्य प्रदेशातल्या उमरीया जिल्ह्यातल्या एका खेडेगावतली ही घटना आहे. रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारासची. आई अर्चना चौधरी दीड वर्षाच्या राजवीरला घेऊन कामासाठी बाहेर पडली. बाजूलाच झुडपात वाघ दडला होता. आई-लेकरू दिसताच काटेरी झुडुपातून झेप घेत पुढ्यात आला अन् राजवीरला पकडलं.

एखाद्याला भोवळच आली असती, पण आई जिद्दीनं उभी राहिली. थेट भिडली. वाघाच्या जबड्यातून राजवीरला सोडवण्यासाठी झुंज सुरु झाली. वाघानं तिलाही पकडलं. नखं मानेत घुसवली. ती जोरजोरात ओरडू लागली. किंचाळू लागली.

महिलेच्या किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांना अंदाज आला. लाठ्या-काठ्या घेऊन पोहोचले. डोळ्यासमोरचं चित्र भितीदायक होतं. तिच्या मानेत घुसलेली वाघनखं. पण कंठातून निघणारा आकांत.

या आवाजानं वाघाचंही मस्तक खवळलं होतं. समोर आलेले गावकरी अन् मातेचा अखंड प्रतिकार पाहून वाघही नरमला. दोघांनाही तिथेच सोडून निघून गेला.

उमरिया जिल्ह्यातलं बांधवगड टायगर रिझर्व्हचा भाग आहे. त्यामुळे इथे हिंस्र पशुंचा नेहमीच वावर असतो. भूक लागली की जनावरांवर हल्ले होतात. रविवारी माणसांवर हल्ला झाला.

अर्चना आणि राजवीर यांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं. वाघाशी झुंज देताना अर्चनाच्या मानेला गंभीर इजा झाली आहे. तिला जबलपूरला पाठवण्यात आलंय. राजवीरची प्रकृतीही स्थिर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.