AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून मराठी भाषिकांच्या पाठीशी राहा’; सीमावासीय पंतप्रधान, गृहमंत्र्यांना हाक देणार

कर्नाटकमध्येही हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यावेळीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा कर्नाटककडून तिच री ओढण्यात आली.

'सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून मराठी भाषिकांच्या पाठीशी राहा'; सीमावासीय पंतप्रधान, गृहमंत्र्यांना हाक देणार
| Updated on: Dec 21, 2022 | 6:48 PM
Share

कोल्हापूरः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रचंड तापला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्या होऊनही मंगळवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही अशी मागच्याच वादाची री त्यांनी ओढली. त्यामुळे सीमावाद आता पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हं दिसून येत आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांनी आता चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने चलो कोल्हापूरचा नारा देत 26 डिसेंबर रोजी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे 1000 हून अधिक कार्यकर्ते कोल्हापुरात येणार असल्याचे म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकातील मराठी भाषिकांवर सातत्याने कन्नडिगांकडून अन्याय आणि अत्याचार केला जात आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याने आता सीमावासियांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे.

बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चलो कोल्हापूरचा नारा देत. महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून सीमावासियांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांवर अन्याय केला जात असल्याने आता म. ए. समितीने चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकमध्येही हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यावेळीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा कर्नाटककडून तिच री ओढण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतरही त्यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असं स्पष्ट सांगितले.

बसवराज बोम्मई यांच्या या भूमिकेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आता तीव्र झाल्यामुळेच त्यांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवेदन देऊन या वादात काय फरक पडणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.