AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी उद्योग गेले, नंतर रोजगार गेले आता महाराष्ट्रातील देवही निघाले बाहेरच्या राज्यात….

आसाम सरकारने होऊ घातलेल्या महाशिवरात्रीनिमित्त जाहिरात केली होती. त्या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, सहाव्या ज्योतिर्लिंग कामरूप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपले स्वागत आहे.

आधी उद्योग गेले, नंतर रोजगार गेले आता महाराष्ट्रातील देवही निघाले बाहेरच्या राज्यात....
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 15, 2023 | 3:36 PM
Share

मुंबई : राज्याच्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातून वेदांता आणि फॉक्सक्वॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यातच आता आणखी एका नव्या मु्द्यामुळे सरकावर विरोधकांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सध्या देशात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचे आहे. मात्र आता या ज्योतिर्लिंगामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आसाम सरकारच्या एका जाहिरातीमध्ये आता भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाम राज्यात असल्याचा दावा केला जात आहे. महाशिवरात्री डोळ्यासमोर ठेवून आता महाराष्ट्रात या ज्योतिर्लिंगाचा वाद पेटू लागला आहे.

या मुद्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारले असता महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही शिल्लक ठेवायचे नाही असेच भाजप नेत्यांनी ठरवले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या मुद्यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, राज्यातून पूर्वी उद्योग गेले आणि रोजगार गेले होते, तर आता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची टीका ठाकरे आणि राऊत यांनी केली आहे.

ईडी सरकारने शिंदे गटाच्या आमदारांची फौज गुवाहाटीला घेऊन गेली होती असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, एक अदृश्य शक्ती म्हणून आसाम सरकारने तिथे मदत केली होती.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसामला भीमाशंकर ज्योतिर्लिंग दिले नसेल ना असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आसाम सरकारने होऊ घातलेल्या महाशिवरात्रीनिमित्त जाहिरात केली होती. त्या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, सहाव्या ज्योतिर्लिंग कामरूप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपले स्वागत आहे.

त्यामध्ये दिलेल्या विविध ज्योतिर्लिंगांच्या यादीत भीमाशंकरच्या नावापुढे ‘डाकिनीमध्ये वसलेले भीमाशंकर’ असंही लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचाही फोटो असल्याचे दिसून येत आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे देवस्थान आसाममध्ये नसून पुण्यात असल्याचा पुरावा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याचे अनेक पुरावे असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!