AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट… पराभवानंतर पक्षात फूट?

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज पक्षाच्या 45 आमदारांनी बँनर्जी यांचा आदेश डावलल्याचे समोर आले आहे.

West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट... पराभवानंतर पक्षात फूट?
mamata banerjee tmcImage Credit source: Google
| Updated on: May 20, 2026 | 7:43 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर आता ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (बुधवार) पक्षाकडून एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या आंदोलनाला अनेक टीएमसी आमदार गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीएमसीच्या 45 आमदारांची आंदोलनाकडे पाठ

समोर आलेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या काही आमदारांनी आज विधानसभा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार आणि फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी शोभनदेव चट्टोपाध्याय, नयना बॅनर्जी, कुणाल घोष आणि ऋतब्रत बॅनर्जी या नेत्यांसह 80 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित होते. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मात्र टीएमसीचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी मात्र पक्षात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

आमदार का गैरहजर?

चट्टोपाध्याय यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आजच्या कार्यक्रमात सुमारे 35 आमदार उपस्थित होते. निवडणुकीनंतर हिंसाचारग्रस्त भागांमध्ये कार्यकर्त्यांसोबत अनेक आमदार व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत. शिवाय हा कार्यक्रम फक्त एका दिवसाच्या नोटिशीवर आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे दूरच्या भागातील आमदारांना सहभागी होणे शक्य झाले नाही.’

आगामी काळात टीएमसी रस्यावर उतरण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी काही आमदारांनी निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष नेतृत्व रस्त्यावर उतरून आंदोलन करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक आमदारांनी स्पष्टपणे सांगितले की, बंद खोलीत बैठका घेऊन आपला गमावलेला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न करणे पक्षासाठी फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे आता आगामी काळात टीएमसी नेते आगामी काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसण्याची शक्यता आहे.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....