AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घशघशीत वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती टक्के वाढ मिळणार?; पगार किती वाढला?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

घशघशीत वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती टक्के वाढ मिळणार?; पगार किती वाढला?
Dearness AllowanceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 25, 2023 | 7:44 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्माचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या डीए आणि डीआरमधील वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. केंद सरकारने महागाई भत्त्यात घसघशीत आणि घवघवीत वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातवरण आहे.

केंद्र सरकारने काल कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना एरिअर्सही मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे.

पगार किती वाढणार?

पगाराच्या हिशोबाने पाहिलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पे 18000 रुपये असेल तर 38 टक्क्याच्या हिशोबाने 6840 रुपये महागाई भत्ता होतो. आता महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून 42 टक्के झाल्याने महागाई भत्ता 7560 रुपये होणार आहे. अधिकाधिक बेसिक पेच्या हिशोबाने पाहिले तर 56000 रुपयाच्या आधारे महागाई भत्ता 21, 280 रुपये होईल. त्यात चार टक्क्याची वाढ केली तर तो 23 हजार 520 रुपये होईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहिन्याला किमान 720 वाढ होईल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाला 8 हजार 640 रुपये वाढ होईल.

मागच्यावेळी महागाई भत्त्यात वाढ किती?

केंद्र सरकारने वार्षिक महागाई भत्त्यात आणि डीआरमध्ये जानेवारीच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या अखेरपर्यंत वाढ केली होती. मात्र गेल्या काही वर्षात ही वाढ कमी झाली. मागच्या सहामाहीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्याने वाढ झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरून 38 टक्के झाला होता.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...