AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारला मोठं यश, ज्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरलं त्यातच मिळवला विजय

बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता.

नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारला मोठं यश, ज्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरलं त्यातच मिळवला विजय
बिहारमधील यशाचं भाजप कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. यासाठी विजय रॅली काढण्यात आली.
| Edited By: | Updated on: Dec 01, 2020 | 7:56 PM
Share

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी सरकारला मोठं यश आलं आहे. भारतात बेरोजगारी दर (Unemployment rate) वाढत असल्यामुळे वारंवार मोदी सरकारवर (Modi government) टीका केली जात होती. इतकंच नाही तर बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता. पण या सगळ्यात नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार ही सरकारच्या बाजूने आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनादरम्यान, भारतात जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18 टक्के होते, ते आता नोव्हेंबरमध्ये 6.51 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. याआधी सप्टेंबर 2018 मध्ये बेरोजगारीचा आकडा 6.47 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) ने आकडेवारी जाहीर केली आहे. (modi government achievements india unemployment rate plummeted in november for the first time since september 2018)

कोरोना जीवघेण्या महामारीमुळे एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 23.52 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये तर ही आकडेवारी सर्वाधिक होती. यानंतर कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ लागल्याचं दिसून आलं.

भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 6.67 टक्के होता. देशातील ग्रामीण बेरोजगारीच्या दराविषयी सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर 6.90 टक्के होता तर नोव्हेंबरमध्ये 6.26 टक्क्यांवर घसरला.

आता देशभरातील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर नोव्हेंबरमध्ये हरियाणात बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 25.6 टक्के होतं. यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं बेरोजगारीचा दर 18.6 टक्के आहे. यानंतर गोवा 15.9 %, त्यानंतर हिमाचल प्रदेश 13.8 %, त्रिपुरा 13.1 %, पश्चिम बंगाल 11.2 % आणि बिहार बेरोजगारी दर 10% आहे.

इतर बातम्या – 

मोदी सरकारला मोठा दिलासा, नोव्हेंबरमध्ये तब्बल 1 लाख कोटींहून अधिक GST जमा

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

(modi government achievements india unemployment rate plummeted in november for the first time since September 2018)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.