AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेश बनला नवीन पाकिस्तान, हिंदूंवरील हल्ले प्रचंड वाढले, मोदी सरकारने दिली आकडेवारी

Attacks On Bangladeshi Hindu: आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सन 2024 मध्ये आठ डिसेंबर पर्यंत हिंदू आणि अल्पसंख्याकांवर 2200 हल्ले झाले आहेत. 2022 मध्ये बांगलादेशात 47 हल्ले हिंदूंवर झाले होते.

बांगलादेश बनला नवीन पाकिस्तान, हिंदूंवरील हल्ले प्रचंड वाढले, मोदी सरकारने दिली आकडेवारी
नरेंद्र मोदी, मोहम्मद युनूस
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 20, 2024 | 7:48 PM
Share

Attacks On Bangladeshi Hindu: बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यापासून अराजकता निर्माण झाली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. अल्पसंख्याक सुरक्षित राहिलेले नाही. परंतु मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार या गोष्टी फेटाळत आहे. आता नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशची पोलखोल केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन यांनी संसदेत लिखित उत्तर दिले आहे. त्यात आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांवर 2200 हल्ले झाल्याचे म्हटले आहे.

डिसेंबरपर्यंत 2200 हल्ले

परराष्ट्र राज्य मंत्री कीर्ति वर्धन यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सन 2024 मध्ये आठ डिसेंबर पर्यंत हिंदू आणि अल्पसंख्याकांवर 2200 हल्ले झाले आहेत. 2022 मध्ये बांगलादेशात 47 हल्ले हिंदूंवर झाले होते. दुसरीकडे 2024 मध्ये पाकिस्तानात हिंदूंवर 112 हल्ले झाले आहेत. या आकडेवारीवरुन बांगलादेश नवीन पाकिस्तान बनल्याचे स्पष्ट होत आहे.

भारताकडून चिंता व्यक्त

परराष्ट्र मंत्री कीर्ति वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, बांगलादेश आणि पाकिस्तानात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या हल्ल्याची आकडेवारी चिंताजनक आहे. भारताने या घटनांची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने यासंदर्भात त्या देशांकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. भारताने म्हटले आहे की, बांगलादेश सरकार त्या देशातील हिंदू आणि अल्पसंख्याक लोकांच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलेल, असा आम्हाला विश्वास आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष बांगलादेश पाकिस्तान
2022 47 241
2021 302 103
2024 2200 112

दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाकापासून ४० किमी अंतरावर असलेल्या टोंगी शहरात इज्तिमाच्या आयोजनावरून मौलानाच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले. या गोंधळात भारताचे समर्थक मौलाना साद आणि बांगलादेशचे समर्थक मौलाना जुबेर यांच्या समर्थकांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत चार जणांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?