AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची आणि रेबिया प्रकरणाची तुलना होऊच शकत नाही, सुनावणीत दरम्यान काय काय घडलं अनिल देसाई म्हणाले…

शिंदे गटाच्या वकिलांनी रेबिया प्रकारण हाच कायदा मानून पाच जणांच्या खंडपिठाकडून याचा निकाल व्हावा असा कल त्यांचा होता असेही खासदार अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

महाराष्ट्राची आणि रेबिया प्रकरणाची तुलना होऊच शकत नाही, सुनावणीत दरम्यान काय काय घडलं अनिल देसाई म्हणाले...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 15, 2023 | 4:59 PM
Share

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ( Supremes Court ) सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून हरिश साळवे ( Harish Salave ) या दोन्ही जेष्ठ वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये रेबिया प्रकरणाचा दाखला देऊन हरिश साळवे यांनी निकाल द्यावा असं अधोरेखित करत निकाल देण्याची मागणी केली होती. तर यावरच ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी यावर आक्षेप घेत महाराष्ट्र आणि रेबिया प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही असं म्हंटलं आहे. त्यानंतर आज हरिश साळवे यांनी पुन्हा काही मुद्दे अधोरेखित केले आहे त्यावर खासदार अनिल देसाई ( MP Anil Desai ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हरिष साळवे यांनी मांडलेला मुद्दा आणि महाराष्ट्राची तुलनाच होऊ शकत नाही असे म्हणत खासदार अनिल देसाई म्हणाले, हरिष साळवे यांचा युक्तिवाद पाऊण तास सुरू होता. त्यामध्ये त्यांचा सारांश असा होता की रेबिया कायदाच येथेही लागू करावा अशी मागणी केली आहे.

शिंदे गटाच्या वकिलांनी रेबिया प्रकारण हाच कायदा मानून पाच जणांच्या खंडपिठाकडून याचा निकाल व्हावा असा कल त्यांचा होता. सॉ. जनरल तुषार मेहता यांनी राज्यपाल यांच्या बाजूने मुद्दा मांडला आहे.

दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर सर्व न्यायमूर्ती चर्चा करत होते. मध्ये जो वेळ मिळेल त्यामध्ये ते चर्चा करत होते. नबाम रेबिया प्रकरण याला लागू होत नाही असेही त्यांनी अर्थ काढला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला अशी परिस्थिती उद्भवली असे नाही. अध्यक्षांच्या अधिकाराचे काय झाले यावर हा युक्तिवाद होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा प्रश्न येत नाही.

पक्षाची बैठक होती त्याला हे आमदार उपस्थित नव्हते, त्यावेळी त्यांना दोन वेळा बोलावण्यात आले होते. ते आले नाही त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांचा राजीनामा हा मुद्दा येत नाही.

याशिवाय तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तिवादावरही अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकी पूर्वी युती आणि त्यानंतर युतीचा मुद्दा जो मांडला तो प्रभावी मुद्दा नव्हता, मेहता यांनी केवळ केविलवाणा प्रयत्न केला आहे.

हरिष साळवे यांनी वारंवार रेबिया प्रकरणानुसार तुम्ही जा अशी विनंती केली त्यामध्ये कोर्टाच्या निदर्शनास आले आहे की हे प्रकरण रेबिया केसनुसार जाणार नाही. त्यामुळे शेवटी कोर्ट याबाबत निर्णय घेणार आहे असेही अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.