AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून सुटणाऱ्या ‘वंदे भारत’चा प्रवास होणार वेगवान, रेल्वेने घेतले हाती हे मिशन

vande bharat: भारतीय रेल्वेचा 'मिशन रफ्तार' प्रोजेक्टनुसार वंदे भारत ट्रेनची स्पीड 160 किमी प्रती तास करण्याची योजना आहे. या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी सिस्टीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षा आयुक्तालयाकडे परवानगी मागितली होती.

मुंबईतून सुटणाऱ्या 'वंदे भारत'चा प्रवास होणार वेगवान, रेल्वेने घेतले हाती हे मिशन
vande bharat
| Updated on: Apr 13, 2024 | 9:46 AM
Share

भारतीय रेल्वेच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय कोणती ट्रेन झाली? या प्रश्नाचे उत्तर अनेकांचे ‘वंदे भारत’ असेच असणार आहे. सेमी हायस्पीड म्हटली जाणारी ही ट्रेन अद्याप आपल्या वेगानुसार धावत नाही. परंतु आता लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावणार आहे. यासंदर्भात सुरु करण्यात येणाऱ्या प्रकल्पाला रेल्वे सुरक्षा आयुक्तालाची मंजुरी मिळाली आहे. मुंबई ते अहमदाबाद वंदे भारतासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यानंतर मुंबई ते अहमदाबाद अंतर अजून कमी वेळेत गाठता येणार आहे.

सुरक्षा आयुक्तांची परवानगी

पश्चिम रेल्वेने वंदे भारतचा वेग अधिक वाढण्याचे ट्रायल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळाली आहे. सध्या मुंबई ते अहमदाबादसह सर्वच वंदे भारत एक्स्प्रेस 130 किमी प्रतीतास वेगापेक्षा अधिक वेगाने धावत नाही. आता तिचा वेग वाढवून 160 किलोमीटर प्रतीतास करण्यात येणार आहे. ही ट्रायल यशस्वी झाल्यास मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील प्रवासाचा वेळ 45 मिनटे कमी होणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी 5 तास 25 मिनिटांचा वेळ लागतो.

सिस्टीमध्ये काही सुधारणा करणार

भारतीय रेल्वेचा ‘मिशन रफ्तार’ प्रोजेक्टनुसार वंदे भारत ट्रेनची स्पीड 160 किमी प्रती तास करण्याची योजना आहे. या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी सिस्टीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षा आयुक्तालयाकडे परवानगी मागितली होती. त्यसाठी या मार्गावर 792 किमीपर्यंत सेफ्टी बॅरियर लावण्यात आले आहे. आता ट्रायलसाठी 16-कारची वंदे भारतचा वापर केला जाणार आहे.

सध्या स्पीड 120-130 किमी

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर 160 किमी प्रतीतास वेगाने वंदे भारत धावण्यासाठी आवश्यक असणारे काम पूर्ण केले गेले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. आता या महिन्यात त्यासाठी ट्रॉयल सुरु होणार आहे. सध्या वंदे भारत ट्रेनची स्पीड 120-130 किमी प्रतीतास आहे. मुंबई-सूरत-वडोदरा-दिल्ली आणि मुंबई-वडोदरा-अहमदाबाद सेक्टर 160 किमी प्रती तास वेगाने गाडी चालवण्यासाठी तयार आहे. या प्रकल्पावर 3,959 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.