AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला

आरोपींनी विवेकची हत्या करण्यापूर्वी त्याला दारु पिण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार तीन आरोपी आणि विवेक एकत्र भेटले आणि दारु पिण्यासाठी गेलेय तेथे गेल्यावर दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारामारीवरुन निक्की आणि विवेकमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली.

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केलाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 04, 2022 | 12:11 AM
Share

उत्तर प्रदेश : दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारहाणीचा बदला (Revenge of the beating) घेण्यासाठी मित्राने मित्राची हत्या (Murder) मृतदेह गंगा कालव्यात फेकल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून खुनात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. विवेक त्यागी (34) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. (Murder of a young man to avenge a quarrel at a wedding two years ago)

मित्रांना भेटायला गेला तो परतलाच नाही

पीडित विवेक हा 3 फेब्रुवारी रोजी रात्री घरच्यांना थोडा वेळात येतो असे सांगून घरातून निघून गेला, पण तो परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर घरच्यांनी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. यावेळी तपास करताना हत्येच्या दिवशी गावातील अन्य तीन मुलेही गायब असल्याचे कळले. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी पीडिताच्या कुटुंबीयांनी मोहित आणि निक्की नावाच्या दोघांनी विवेक अपहरण केले असावे, अशी शंका व्यक्त केली. हे दोघेही विवेकचे मित्र आहेत. त्यानंतर सर्विलांसद्वारे पोलिसांनी हत्येच्या दिवशी पीडित आणि आरोपींचे लोकेशन एकत्र असल्याचे कळले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

जुना वाद उफाळून आला अन्

आरोपींनी विवेकची हत्या करण्यापूर्वी त्याला दारु पिण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार तीन आरोपी आणि विवेक एकत्र भेटले आणि दारु पिण्यासाठी गेलेय तेथे गेल्यावर दोन वर्षापूर्वी लग्न समारंभात झालेल्या मारामारीवरुन निक्की आणि विवेकमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली. यानंतर निक्की आपले दोन साथीदार मोहित आणि रितू त्यागी यांच्यासोबत मिळून विवेकला जबर मारहाण करीत त्याची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि पोलिस आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी आरोपींनी विवेका मोबाईल मेरठ रोडला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकला. (Murder of a young man to avenge a quarrel at a wedding two years ago)

इतर बातम्या

Nalasopara Molestation : नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

Mobile Theft : कामानिमित्त आला आणि मोबाईल लंपास करून गेला, डोंबिवलीतील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली