AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Murder : पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्या

हरमित सिंह याला आईवडिलांकडून दरमहा 18,500 रुपये पॉकिटमनी मिळत असे. मात्र यामध्ये तो नाखूश होता. हे पैसे त्याला वैयक्तिक खर्चासाठी कमी पडत होते. याच रागातून त्याने आई-वडिलांची हत्या घडवून आणली. याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी आरोपी मुलासह दोघांना अटक केली आहे.

Punjab Murder : पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्या
पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्याImage Credit source: TV9 Marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 27, 2022 | 8:12 PM
Share

लुधियाना : पॉकिटमनी कमी पडत होता म्हणून मुला (Son)ने स्वतःच्या आई-वडिलांची सुपारी देऊन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पंबजामधील लुधियानात उघडकीस आली आहे. भूपिंदर सिंह (65) आणि सुष्पिंदर कौर (62) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हरमित सिंह असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. हरमित सिंह याला आईवडिलांकडून दरमहा 18,500 रुपये पॉकिटमनी मिळत असे. मात्र यामध्ये तो नाखूश होता. हे पैसे त्याला वैयक्तिक खर्चासाठी कमी पडत होते. याच रागातून त्याने आई-वडिलांची हत्या घडवून आणली. याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी आरोपी मुलासह दोघांना अटक केली आहे. बलविंदर उर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत हरमितने आपला गुन्हा कबूल केला आहे. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आई-वडिलांना मारण्यासाठी अडीच लाखांची सुपारी

मयत भूपिंदर सिंह हे भारतीय वायुसेनेतून ऑडिट ऑफिसर पदावरुन निवृत्त झाल्यानंतर एक शाळा चालवत होते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 50 यार्डांमध्ये घरे बांधून ते विकायचे. हरमितने तीन बेरोजगार युवकांसोबत मिळून आई-वडिलांच्या हत्येचा कट रचला. आरोपी बलविंदर, विकास आणि सुनील हे तिघे आधी हरमितसोबत काम करायचे. मात्र सध्या तिघेही बेरोजगार आहेत. हरमितने आई-वडिलांना मारण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी या तिघांना दिली होती. मंगळवारी रात्री त्याने या तिघांना आई-वडिलांच्या नकळत घरात घुसवून छतावर लपवले.

उशीने नाक-तोंड दाबून दाम्पत्याची हत्या

भूपिंदर सिंह आणि सुष्पिंदर कौर हे दररोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात असत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी उठून ते मॉर्निंग वॉकसाठी तयार झाले. याच दरम्यान बलविंदर, विकास आणि सुनील यांनी दोघांवर हल्ला करत उशीने नाक तोंड दाबले. यातच श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. यावेळी हरमित सिंह घरातील पहिल्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपला होता. हत्येची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी घराच्या आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मुलानेच आई-वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मयत दाम्पत्याचा मुलगा हरमित सिंह आणि त्याचा साथीदार बलविंदर या दोघांना अटक केली. तर अन्य दोन साथीदार विकास आणि सुनील हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Murder of parents by a son due to lack of pocket money in Ludhiana Punjab)

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....