‘हिंदुस्थानात’ राहायचे असेल तर ‘लक्ष्मी-गणेशा’चा जय घालावाच लागेल,’आप’ आमदाराचा भाजपवर हल्लाबोल

भाजपच्या लोकांना गणेशजी, लक्ष्मी यांची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे.

'हिंदुस्थानात' राहायचे असेल तर 'लक्ष्मी-गणेशा'चा जय घालावाच लागेल,'आप' आमदाराचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 8:46 PM

नवी दिल्लीः नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेशजी (Ganesh) आणि लक्ष्मीजींचाही (Laxmi) फोटो असायला हवा असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला, आणि त्यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. आता या राजकारणात आपचे आमदार नरेशकुमार बालियान (Naresh Balyan) यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला गणेशजी आणि लक्ष्मीजींची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे, असा सल्ला त्यांना दिला आहे. त्यावरुन प्रचंड मोठे राजकारण सुरु झाले आहे.

याबद्दल नरेशकुमार बालियान यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भाजपच्या लोकांना गणेशजी, लक्ष्मी यांची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे.

भाजपच्या नेत्यांना भगवान श्री गणेश-लक्ष्मीजींबद्दल काही अडचण नसेल आणि ते खरे हिंदू असतील, तर उघडपणे जय श्री गणेश-जय लक्ष्मी माता” लिहावे असं जाहीर आव्हानही त्यांनी केले आहे.

आणि ते जर तसं लिहित नसतील तर ते हिंदूविरोधी आहेत हे समजून घ्या अशी जोरदार टीका त्यांच्या वर केली आहे. त्यामुळे भारतातच राहायचे असेल तर गणेश-लक्ष्मी जय हे म्हणावेच लागेल असंही त्यांनी म्हटले आहे.

नरेशकुमार बालियान यांनी भाजपर सडेतोड हल्ला करत त्यांनी भाजप पक्ष हा हिंदूंचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याचा दावा करत आहे.

भाजपला हिंदूबद्दल अजिबात आदर नसल्याचेही त्यांनी सांगितले. सणासुदीच्या पहिल्याच दिवशी गुजरातमधील भाजपचे कार्यकर्ते मात्र लक्ष्मी आणि गणेशाला विरोध करत आहेत.

त्यामुळे भाजपवाल्यांनी हिंदूंचा फक्त मतं मागण्यासाठी वापर करुन घेतला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत गणेशच तुम्हाल संपवून टाकेल असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.