AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणा यांच्या पत्राची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडून दखल, 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

नवनीत राणा यांच्या पत्राची आता राष्ट्रीय अनुसूचित आयोगानेही दखल घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त आरती सिंग आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांच्या पत्राची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडून दखल, 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?
नवनीत राणा, खासदारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह सहा जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता. संसदेनं हा हक्कभंग दाखल करुन घेत मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह (Mumbai, Amravati Police Commissioner) या सहाही जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सर्वांना आता संसदेत उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. यानंतर आता नवनीत राणा यांच्या पत्राची आता राष्ट्रीय अनुसूचित आयोगानेही दखल घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त आरती सिंग आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सिंग आणि ठाकरे यांनी राणा यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या बैठकीनंतर आता अॅट्रॉसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठीच आमच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात तर मी ईडी आणि सीबीआयकडेही धाव घेणार आहे. आरती सिंग यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं असून सिंग या निलंबित होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

‘कुणावरही अन्याय होऊ नये’

आज माझ्यावर अन्याय झाला. उद्या आणखी कुणावर होईल. इतर कुणावरही असा अन्याय होऊ नये म्हणून हक्कभंग दाखल केला आहे. आरती सिंग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांना सस्पेंड करेपर्यंत मी शांत बसणार नाही. सीबीआय आणि ईडीमध्ये जाणार आहे. या मॅडम ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगवर होत्या तिथल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. मी घोटाळ्याची माहिती काढली आहे. महाराष्ट्रात येणं आणि लोकप्रतिनिधीसोबत असा व्यवहरा करणं हे खपवून घेतलं जात नाही हे दाखवण्यासाठी मी लढत आहे, असं राणा यांनी म्हटलंय.

आमदार रवी राणांचाही आरोप

आमदार रवी राणा यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. सीपी आरती सिंग यांनी 307, 353 सारखे खोटे गुन्हे माझ्याविरोधात दाखल केले. मी दिल्लीत असताना गुन्हा दाखल केला. वरून दबाव असल्याचं कारण दिलं. अनेक लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी बदनामी केली जात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय.

इतर बातम्या : 

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.