वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कु तुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे.

वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा
ओबीसी आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, न्यायाचा अधिकार मिळालाच पाहिजे-शरद पवार
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 9:08 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद-मंदिर वाद (Gyanvapi mosque-temple dispute) गाजत आहे. मशीद मंदिराच्या विषयामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. नेमकं याच वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आपले आता स्पष्ट मत मांडले आहे. हे मत मांडत असताना त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही, पण काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव संपवण्यासाठी भाजपचं धोरण आहे.

महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचा विचार-विचारसरणी वेगळी

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपवर टीका केली. अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदणार असं आम्हाला नेहमीच वाटत आले होते, मात्र भाजपचा विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना घेऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

देशात जातीय वातावरण

ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की,वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. मात्र आता भाजप हिंदू मुस्लीम हा वाद नव्याने उखरुन काढत आहे.

ताजमहाल आमचा आहे

अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यावर देशासोबतच जगभरातील लोकही अभिमान बाळगतात. ताजमहालसारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी ते बनवले.

कुतुबमिनार कोणी बांधला जगाला माहीतय

दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कु तुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी, सांप्रादायिक विचारांना चालना दिली जात असल्याचे मत शरद पवार यांनी मांडले.

…हाच त्यांचा अजेंडा

मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणत आहेत, हाच त्यांचा अजेंडा आहे. काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे हेच भाजपचं धोरण असल्याची टीका पवारांनी केली.

महिलांना घर चालवणं कठीण झाले

महागाईमुळे आज देशातील महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे. मात्र महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाही. त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.