AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळचा भारताला मोठा दणका! थेट बंदी, भारत मित्र मित्र करत बसला तिकडे थेट..

नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच आता नेपाळने भारताविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, नेपाळने घेतलेल्या या निर्णयाने मोठा धक्का बसला.

नेपाळचा भारताला मोठा दणका! थेट बंदी, भारत मित्र मित्र करत बसला तिकडे थेट..
Balen Shah
| Updated on: Jun 09, 2026 | 9:01 AM
Share

भारत नेपाळसोबत संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नेपाळ शेजारी काही देशांच्या नादी लागून भारताविरोधात भूमिका घेत आहे. त्यामुळे दोन्ही देशात पूर्वीसारखे चांगले संबंध दिसत नाहीत. त्यामध्येच आता भारताला मोठा दणका देत नेपाळने भारताच्या आंब्यासोबतच काही फळांवर नेपाळमध्ये बंदी घालती आहे. भारतीय फळांवर नेपाळमध्ये बंदी घातल्याने नेपाळच्या शहरांमध्ये फळांचे भाव वाढले. फळ व्यापाऱ्यांवर थेट परिणाम होत आहे. राइजिंग नेपाळ डेलीच्या रिपोर्टनुसार, नेपाळमध्ये भारतीय आंब्याची मोठी मागणी आहे. नेपाळी लोकांना भारतीय आंबे प्रचंड आवडतात. नेपाळमध्ये आंब्याचे उत्पादन म्हणावे तेवढे होत नाही. त्यामध्ये व्यापारी आंब्यांची मागणी पुरवण्याकरिता भारताकडून मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करतात. मात्र, अचानक भारतीय आंब्यांवर बंदी घातल्याने त्याचा मोठा परिणाम मार्केटमध्ये बघायला मिळतोय.

अचानक बंदी घातल्याने मोठी समस्या निर्माण झाली. नेपाळी आंब्यांचा हंगाम फक्त दोन महिन्यांचा असतो. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात भारतातून आंब्यांची आयात करतात. भारतातून आंब्यांच्या कमतरतेमुळे स्थानिक पातळीवर उत्पादित आंब्यांची टंचाई निर्माण झाली झाली. यासोबतच भावही गगणाला पोहोचले आहेत. फक्त भारतीय आंबेच नाही तर इतरही काही भारतातून जाणाऱ्या फळांवर नेपाळी सरकारने बंदी घातली आहे.

यादरम्यानच नेपाळच्या व्यापाऱ्यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, जर सरकारने ही बंदी उठवली नाही तर ग्राहकांना थेट किमत मोजावी लागेल आणि फळांचे भाव अधिक वाढतील. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सध्या सर्वच फळांच्या किमती वाढल्या आहेत. भारताच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात नेपाळ सरकार बंदी घालताना दिसत आहे.

भारताबद्दल विविध दावेही नेपाळ सरकारकडून केली जात आहे. नेपाळचे विदेश मंत्री भारताच्या दाैऱ्यावर होते. भारत नेपाळसोबत व्यवस्थित संबंध ठेवत आहे. समोरून चांगले संबंध नेपाळ ठेवत आहे. मात्र, मागून भारताच्या विरोधात काड्या करण्याचे काम नेपाळचे सुरू आहे. आता भारतीय फळावर नेपाळमध्ये बंदी घातल्याने तणाव वाढू शकतो. यावर भारत नक्की काय भूमिका घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा