AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोलवसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी

'कोरोना' व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा 25 मार्च रोजी केली होती (NHAI to start Toll Collection on National Highways)

टोलवसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 19, 2020 | 12:53 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) उद्यापासून (सोमवार 20 एप्रिल) देशभरात पुन्हा टोलवसुली सुरु करणार आहे. तब्बल 25 दिवसांनंतर आज मध्यरात्रीपासून देशभरातील महामार्गांवर पुन्हा टोल आकारला जाणार आहे. (NHAI to start Toll Collection on National Highways)

‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन सेवा सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा 25 मार्च रोजी केली होती. परंतु लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु असतानाही टोल आकारणी आधीच सुरु होत आहे.

‘सर्व ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथिलता लक्षात घेता, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गृह मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे आणि 20 एप्रिल 2020 पासून टोलवसुली पुन्हा सुरु करावी’ असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने NHAI ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : ‘कोरोना’ संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा

‘गृह मंत्रालयाने 20 एप्रिलपासून बऱ्याच प्रकारच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. यामध्ये व्यावसायिक आणि खाजगी आस्थापनांसह बांधकामास आवश्यक मालाच्या वाहतुकीचाही समावेश आहे.’ असा उल्लेख ‘NHAI’ ने 11 आणि 14 एप्रिलला पाठवलेल्या पत्रात केल्याचंही गृह मंत्रालयाने नमूद केलं आहे. या कारणांमुळे टोल वसुली पुन्हा सुरु करत असल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं. (NHAI to start Toll Collection on National Highways)

दरम्यान, ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस’ने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘एकीकडे सरकारला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेवण्याची इच्छा आहे. आम्ही सर्व अडथळे पार करत, तोटा सहन करत राष्ट्रसेवा करत आहोत. त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य आहे.’ असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ई कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनवाश्यक वस्तूच घरपोच पाठवत येणार आहेत, इतर वस्तू डिलिव्हरी करण्यास मनाई कायम आहे

(NHAI to start Toll Collection on National Highways)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.