AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर केले चार मोठे दावे

मध्यरात्री भारताने मोठी कारवाई केली आहे, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र आता पाकिस्तानकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे.

Operation Sindoor : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर केले चार मोठे दावे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 3:06 PM
Share

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले होते. अखेर या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.   पीओके आणि पाकिस्तानमध्ये भारतानं मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री भारताकडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर असं या मिशनला नाव देण्यात आलं आहे.

भारतानं पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला.  दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्यानंतर आता पाकिस्तानकडून मोठा दावा करण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानच्या 9 ठिकाणी नाही तर सहा ठिकाणी हल्ला केल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यानं म्हटलं आहे. भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे, एअर स्ट्राईकमध्ये फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.

मात्र असं असताना देखील आमचे 26 नागरिक मारले गेले तसेच 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाच भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्तानने केला आहे. दरम्यान पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारतानं जिथे एअर स्ट्राईक केला तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच अशा  उलट्या बोंबा मारायला देखील पाकिस्तानने आता सुरू केलं आहे.

भारतानं या मिशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. मध्यरात्री भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 अशी एकूण 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानची झोप उडली असून, पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजला आहे. पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते, याचा बदला आता घेण्यात आला आहे.

Follow Us
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा