AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 कोटीच्या आरोपावर समीर वानखेडेंना बाजुला ठेवलं पाहिजे? फडणवीस म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे !

शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणं योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील.

25 कोटीच्या आरोपावर समीर वानखेडेंना बाजुला ठेवलं पाहिजे? फडणवीस म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे !
पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 27, 2021 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या 25 कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही आरोप लागले आहेत त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल. जर एनसीबीला तसं वाटलं ही चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील. आज त्यांना तसं वाटलं नसेल, असे फडणवीस म्हणाले. (Opposition leader Devendra Fadnavis’s response to the Rs 25 crore allegation against Sameer Wankhede)

तसेच शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणं योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील. शेवटी यासंदर्भातील निर्णय करायला मी अधिकारी नाही आणि मला त्यात बोलण्याचा अधिकारही नाही. एनसीबीचं जे काही इंटरनल फँडिंग आहे त्या आधारावर ते निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

संजय राऊत कोणाची वकिली करताहेत, ड्रग्जवाल्यांची वकिली करतात का? हा सवाल माझा त्यांना आहे. ज्या मुंबईला महाराष्ट्राला ज्या प्रकारे ज्रग्जचा विळखा पडला आहे, तरुण पिढी बरबाद होत आहे. त्याच्या विरुद्ध लढायच्या ऐवजी जर संजय राऊतांसारखे लोक त्यांना समर्थन देत असतील तर ईश्वरच मालिक आहे ही परिस्थिती असणार आहे. मला त्यांना उत्तर देण्याची इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचंय. संजय राऊत यांचा उद्देश इतकाच आहे की मूळ मुद्द्यांपासून सगळं भटकलं पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये. संजय राऊत कधीही शेतकऱ्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात एवढा भयानक पाऊस झाला, शेतकऱ्याची परिस्थिती इतकी वाईट झाली, त्यांना एक नवा पैसा मिळत नाही त्याही बद्दल एक शब्द बोलत नाही. मला असं वाटतंकी मी त्यांना काय उत्तर देऊ, असे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिकांनी कोर्टात पुरावे सादर करावे

कुठल्याही इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याला वैयक्तिक टार्गेट करणं योग्य नाही. तुमच्याजवळ काही पुरावे असतील तर तुम्ही कोर्टात दिले पाहिजे कारण ऑनगोईंग केस आहे. ऑनगोईंग केसमध्ये संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती बाहेर बोलतो पण कोर्टात मात्र पुरावे देत नाही, हे अतिशय चुकीचे आहेत. जे काही चाललेलं आहे त्यामध्ये प्रोसिक्युशनचे जे विटनेस आहेत त्यांची क्रेडिबिलिटी खराब करायचं काम जर सरकारी तंत्राने व्हायला लागलं तर यापुढे कुठलीच केस कुठेच टिकणार नाही. आणि एक नविन चुकीची पद्धत या ठिकाणी तयार होईल. नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडे काही पुरावे असतील ते कोर्टात पुरावे सादर केले पाहिजे. दुसरीकडे वानखेडेंच्या पत्नीने सगळे पुरावे दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर उत्तर दिले. (Opposition leader Devendra Fadnavis’s response to the Rs 25 crore allegation against Sameer Wankhede)

इतर बातम्या

एनीसीबीचं दिल्लीतून आलेलं पथक कामाला लागलं, समीर वानखेडेंचा जबाब नोंदवण्यास सुरुवात, कथित 25 कोटी डीलचं खरं-खोटं बाहेर पडणार

एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना हाक मारतात तसं कोणीतरी मला ‘दाऊद’ म्हणत असेल, समीर वानखेडेंच्या वडिलांचा अजब दावा

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा