AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी गेले कुठे? एनआयएचा तपास कुठपर्यंत पोहचला?

Pahalgam Terror Attack Terrorists: पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएकडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक आणि स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. एनआयए या प्रकरणाचा तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी गेले कुठे? एनआयएचा तपास कुठपर्यंत पोहचला?
pahalgam terror attack
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 28, 2025 | 9:52 AM
Share

Pahalgam Terror Attack Terrorists: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यास आता सहा दिवस झाले आहे. परंतु हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडले नाही. हल्लेखोर कुठे गेले आहे? लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. त्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा अजून समजला नाही. हे दहशतवादी पाकिस्तानात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थनिकांच्या पाठिंब्याने ते लपल्याची आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएकडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक आणि स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. एनआयए या प्रकरणाचा तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तपास संस्थेला काही संकेत मिळाले आहे. त्याच्या आधारावर काम केले जात आहे. लवकरच काही सकारात्मक गोष्टी समोर येतील, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहेलगाममधील सुरक्षा एक चूक आहे. निष्काळजीपणा किंवा समजुतीचा अभाव आहे. त्या ठिकाणी सुरक्षेत हलगर्जीपणा झाला आहे, हे निश्चित आहे. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात जम्मू-काश्मीरचा कोणताही पोलिस किंवा सीआरपीएफचा कोणताही जवान तैनात नव्हता. तर बैसरणच्या खाली सुमारे ५ किमी अंतरावर सीआरपीएफ कंपनीची चौकी आहे. पर्यटक या चौकीच्या समोरून दरीत पोहोचत होते. सीआरपीएफच्या तीन प्लाटूनपैकी दोन प्लाटून सामान्य गस्तीवर काम करतात आणि एक पोलीस स्टेशन अंतर्गत काम करते.

सुरुवातीला बैसरन खोऱ्यात इतका मोठा हल्ला झाला आहे, त्यावर सुरक्षा यंत्रणेचा विश्वास बसला नाही. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पोलीस आणि सीआरपीएफ घटनास्थळी पोहचले. आता बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. ज्या भागावर सुरक्षा नाही, त्याठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आणली जाणार आहे. संवेनशील ठिकाणी पर्यटकांना नो एन्ट्री करण्यात येणार आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत