AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? सर्व्हेतून धक्कादायक माहिती आली समोर

मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. या संघर्षच्या काळात पाकिस्तानसह भारताच्या इतरही शत्रूंची माहिती समोर आली होती. पण भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते आता समोर आले आहे.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? सर्व्हेतून धक्कादायक माहिती आली समोर
Indias Enemy
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 22, 2025 | 11:17 PM
Share

मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षच्या काळात पाकिस्तानसह भारताच्या इतरही शत्रूंची माहिती समोर आली होती.

भारत गेल्या काही काळापासून प्रत्येक देशाशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारतीय नागरिक कोणत्या देशाला सर्वात मोठा शत्रू मानतात याबाबत माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. यात अमेरिका, चीन की पाकिस्तान यापैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे याची माहिती देण्यात आली आहे.

भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

प्यू रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणात अनेक भारतीय लोकांनी सहभाग घेतला होता. यातील 2 टक्के लोकांनी अमेरिकेला भारताचा शत्रू मानले आहे. तसेच 33 टक्के भारतीय लोकांनी चीनला भारताचा मोठा शत्रू मानले आहेृ. मात्र भारतातील सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के लोकांनी पाकिस्तानला भारताचा सर्वात मोठा शत्रू मानले आहे. पाकिस्तानकडून भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे या लोकांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आणि चीन भारताचे शत्रू का आहेत?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने चीनसोबत एक आणि आणि पाकिस्तानसोबत चार युद्धे लढली आहेत. हे दोन्ही देश भारतीय जमिनीवर आपला हक्क गाजवतात. तसेत पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्याचे काम करतो. तसेच चीन भारताला वेढण्यासाठी समुद्रात आणि जागतिक व्यासपीठांवर ताकदीचा वापर करतो. तसेच चीनने अनेकदा संयुक्त जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे भारतीय लोक या देशांना सर्वात मोठा शत्रू मानतात. त्याचबरोबर तुर्की आणि अझरबैजान हे देशही भारताचे शत्रू आहेत. या देशांनी भारत-पाक संघर्ष झाला त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.

Follow Us
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन