AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? सर्व्हेतून धक्कादायक माहिती आली समोर

मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. या संघर्षच्या काळात पाकिस्तानसह भारताच्या इतरही शत्रूंची माहिती समोर आली होती. पण भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते आता समोर आले आहे.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? सर्व्हेतून धक्कादायक माहिती आली समोर
Indias Enemy
| Updated on: Jul 22, 2025 | 11:17 PM
Share

मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षच्या काळात पाकिस्तानसह भारताच्या इतरही शत्रूंची माहिती समोर आली होती.

भारत गेल्या काही काळापासून प्रत्येक देशाशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारतीय नागरिक कोणत्या देशाला सर्वात मोठा शत्रू मानतात याबाबत माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. यात अमेरिका, चीन की पाकिस्तान यापैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे याची माहिती देण्यात आली आहे.

भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

प्यू रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणात अनेक भारतीय लोकांनी सहभाग घेतला होता. यातील 2 टक्के लोकांनी अमेरिकेला भारताचा शत्रू मानले आहे. तसेच 33 टक्के भारतीय लोकांनी चीनला भारताचा मोठा शत्रू मानले आहेृ. मात्र भारतातील सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के लोकांनी पाकिस्तानला भारताचा सर्वात मोठा शत्रू मानले आहे. पाकिस्तानकडून भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे या लोकांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आणि चीन भारताचे शत्रू का आहेत?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने चीनसोबत एक आणि आणि पाकिस्तानसोबत चार युद्धे लढली आहेत. हे दोन्ही देश भारतीय जमिनीवर आपला हक्क गाजवतात. तसेत पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्याचे काम करतो. तसेच चीन भारताला वेढण्यासाठी समुद्रात आणि जागतिक व्यासपीठांवर ताकदीचा वापर करतो. तसेच चीनने अनेकदा संयुक्त जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे भारतीय लोक या देशांना सर्वात मोठा शत्रू मानतात. त्याचबरोबर तुर्की आणि अझरबैजान हे देशही भारताचे शत्रू आहेत. या देशांनी भारत-पाक संघर्ष झाला त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.