AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CAA : नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय? पाकिस्तानसह ‘या’ देशातील लोकांना मिळणार भारताचं नागरिकत्त्व

What is the CAA rule in India : आगामी लोकसभा निवडणूकीआधी सत्ताधारी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांआधी संसदेत मंजूर केलेला कायदा लागू केला आहे. नेमका काय आहे हा कायदा? विरोधक का करत या कायद्याला विरोध? जाणून घ्या.

CAA : नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय? पाकिस्तानसह 'या' देशातील लोकांना मिळणार भारताचं नागरिकत्त्व
What is the CAA rule in India?
| Updated on: Mar 11, 2024 | 7:39 PM
Share

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीये. सीएए कायदा हा देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे. हा कायदा पाच वर्षांआधी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. या कायद्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला. परंतु सीएए म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय आहे आणि विरोधक का विरोध करत आहेत जाणून घ्या.

(Citizenship Amendment Act) सीएए कायद्याचा अर्थ?

CAA म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा होय. या कायद्यामध्ये तीन देशातील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची तरतूद आहे. पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान अशा तीन देशांचा यामध्ये समावेश आहे.  धार्मिक छळामुळे  पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळ काढलेल्या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे.

सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व देण्याचा प्रयत्न आहे. याआधी भारताचं नागरिकत्त्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्षे राहणं आवश्यक होतं. पण नागरिकत्त्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. या कायद्यानुसार आता 6 वर्षे इतकी अट करण्यात आली आहे.

CAA कायद्याला विरोधकांचा का आहे विरोध?

या कायद्यानुसार  पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व  मिळणार आहे. यामध्ये  हिंदू, बौद्ध, जैन, पारशी ख्रिश्चन आणि शीख या धार्मिक अल्पसंख्यांकांया समावेश आहे. मात्र मुस्लिम धर्माचा यामध्ये समावेश नसल्याने विरोधकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे.  काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी या कायद्याला कडाडूव विरोध केला आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात हा कायदा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू केल्यावर आता संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  संबोधित करणार असल्याची माहिती समजत आहेत. मोदी काय बोलणार आहेत याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.