AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026 : मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या निर्णयाची दुप्पट किंमत मोजावी लागली – PM मोदी

PM Modi : टीव्ही9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. मोदी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

WITT Summit 2026 : मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या निर्णयाची दुप्पट किंमत मोजावी लागली - PM मोदी
modi tv9Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 23, 2026 | 10:16 PM
Share

टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2004 ते 2010 या कालावधीत काय घडले? त्या काळात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींचे संकट निर्माण झाले होते. पण त्या वेळी काँग्रेसने देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या सत्तेची अधिक काळजी घेतली. त्या काळात काँग्रेसने 1.48 लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड्स जारी केले होते. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः मान्य केले होते की या निर्णयामुळे पुढील पिढ्यांवर कर्जाचा भार पडत आहे. याचा फटका आमच्या सरकारला बसला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेसवर टीका

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004 पासून 2010 पर्यंत काय झालं? काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेलचं संकट आलं होतं. तेव्हा काँग्रेसने देशाची नव्हे तर आपल्या सत्तेची चिंता केली. तेव्हा काँग्रेसने 1 लाख 48 हजार करोड रुपयांचे ऑईल बाँड जारी केले होते, त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, ते येणाऱ्या पिढीवर कर्जाचा बोजा टाकत आहे. ऑईल बाँडचा निर्णय चुकीचा आहे हे माहीत असूनही रिमोट कंट्रोलने सरकार चालवणाऱ्यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी हा चुकीचा निर्णय घेतला.

आम्ही काँग्रेसचं पाप धुतलं – PM मोदी

कारण उत्तरदायित्व नव्हते. त्या बाँडवर रिपेमेंट 2020 नंतर करायचे होते. आमच्या सरकारने पाच सहा वर्षात काँग्रेस सरकारचे ते पाप धुण्याचं काम केलं आहे. त्या धुलाईचा खर्च कमी आला नाही. अशी लॉन्ड्री तुम्ही पाहिली नसेल. 1 लाख 48 हजार कोटी रुपयांच्या जागी देशाला 3 लाख कोटीहून अधिकचे पेमेंट करावा लागला. कारण त्यात व्याजही आलं होतं. आम्ही जवळपास दुप्पट रक्कम चुकवली. आजकाल काँग्रेसचे नेते भाषणांची मिसाईल सोडत आहेत, त्यांच्या या विषयाचा संदर्भ येताच त्यांची बोलती बंद होते.

पुढे जागतिक परिस्थिती आणि युद्धावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘जगात कितीही अस्थिरता असली तरी भारताने आपल्या प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे. जर मी 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यानंतरच्या मागील 23 दिवसांचा आढावा घेतला, तर देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तर ते दक्षिणपर्यंत हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवर काम झाले आहे. दिल्ली मेट्रो रेलच्या महत्त्वाच्या कॉरिडोरचे लोकार्पण, सिलचर येथील हाय-स्पीड कॉरिडोरचे भूमिपूजन, कोटा येथे नव्या विमानतळाचे भूमिपूजन, मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे अशी अनेक महत्त्वाची कामे या 23 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहेत.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत