Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन व्हिडिओ, जनतेला पुन्हा मोठे आवाहन, कशाच्या दिल्या शुभेच्छा?
PM Narendra Modi Appeal to Public: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी जनतेला पुन्हा मोठे आवाहन केले आहे. युद्ध काळातही भारताने मोठी भरारी घेतल्याचे कौतुक केले आहे. त्यांनी यावेळी विरोधकांवरही तोंडसुख घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्या या नवीन व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान आले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या दमदार कामगिरीचा उल्लेख केला आहे. तर जनतेला पुन्हा मोठे आवाहन केले आहे. सीजेपी आंदोलनानंतर पीएम मोदी हे छोटे व्हिडिओ तयार करून तरुणाईला साद घालताना दिसत आहे. त्यांच्या व्हिडिओला तरुणाईतून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. आताही त्यांनी संवादासाठी नवीन व्हिडिओ माध्यम म्हणून निवडला आहे. या व्हिडिओत त्यांनी देशाच्या प्रगतीवर भाष्य केले आहे. तसेच विरोधकांवर तोंडसुख घेतले आहे.
विकासाचा दर 7.08 टक्के
जग हे संकटांनी घेरल्या गेले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 2020 च्या कोरोनापासून ते आतापर्यंत कुठेही स्थिरता दिसत नाही. इतके संकट असतानाही भारत वेगाने प्रगती करत आहे. दुसरीकडे भारतातील काही लोकं निराशेच्या गर्तेत अडकलेले आहे. खोटेपणा पसरवत काही लोक ही निराश वाढवत आहेत. या सर्व संकटांवर मात करत, अडथळे दूर करत देशाने 7.08 टक्क्यांचा विकास दर गाठला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारताने विकासाचा दर GDP मध्ये वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला विकासाचा दर कायम ठेवायचा आहे. आपल्याला प्रगतीत सातत्य ठेवायचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
7.8% growth.
Strong numbers.
Even stronger confidence. pic.twitter.com/ZVPpnAXrVU
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
नागरिकांना काय केले आवाहन?
हा विकास दर कायम ठेवण्यासाठी आत्मनिर्भर भारत असणे आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र, व्होकल फॉर लोकल, परदेशी यात्रेवर जाऊ नका. फिरण्यासाठी, पर्यटनासाठी परदेशात जात असाल तर जाऊ नका, असे आवाहन पीएम मोदी यांनी केले. परदेशात लग्न करत असाल तर करू नका. मेड इन इंडियाचा मंत्र जपा. जर गरज नसेल तर सोने सुद्धा खरेदी करु नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले आहे. आपण जितका जास्त स्वदेशीचा मंत्र जपू आत्मनिर्भर भारताचा संकल्प जपू तेव्हा मला विश्वास आहे की, स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तरुण पिढीच्या हाती आपण विकसीत भारत सोपवू, असे मोदी म्हणाले. तरुण पिढीची स्वप्न आज आपण आपल्या श्रमातून साकार करुयात. देशातील नागरिकांनी आता पुरुषार्थ करण्यात कुठेही कमी पडू नये असे आवाहन मोदी यांनी जनतेला केले. आमची नीती योग्य आहे आणि नियतही स्वच्छ आहे. 140 कोटी जनतेची शक्ती आज एकजूट होऊन देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. चला आनंदही साजर करूयात आणि संकल्पही करूयात. संकल्प सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत चला असे आवाहन करत मोदी यांनी जनतेला या नवीन विकास दराबाबत आणि देशाच्या प्रगतीबाबत खूप खूप शुभेच्छा दिल्या.
