ईडीच्या कारवाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

| Updated on: Apr 15, 2024 | 7:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत बोलताना ईडीकडून होत असलेल्या कारवाईवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देशातील ९७ टक्के लोकांवर होणारी कारवाई ही अराजकीय आहे. ज्यांनी काही चुकीचे केले आहे त्यांनाच घाबरण्याची गरज आहे.

ईडीच्या कारवाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले
Pm modi interview
Follow us on
PM Modi on ED : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत बोलतांना काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. ईडी आज उत्कृष्ट काम करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यांनी दावा केला की एजन्सीच्या 97 टक्के प्रकरणे राजकारणात सहभागी नसलेल्या लोकांविरुद्ध आहेत. इतकंच नाही तर भाजपच्या काळात ईडी आणि सीबीआयशी संबंधित कोणतेही कायदे बनवण्यात आले नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. उलट भाजप सरकारने निवडणूक आयोग बदलण्यासाठी कायदा आणला. याआधी कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींनाच निवडणूक आयुक्त बनवले जायचे आणि नंतर त्यांना राज्यसभा किंवा इतर मंत्रालयांवर पाठवले जायचे. पंतप्रधानांनी उपरोधिकपणे सांगितले की, पण आम्ही (भाजप) त्या पातळीचे काम करू शकत नाही.

भ्रष्टाचाराने घेरलेल्यांना पापाची भीती

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, “प्रामाणिक माणसाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नसते. पण भ्रष्टाचाराने घेरलेल्यांना पापाची भीती असते. आज किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही. आणि हेच विरोधी नेते आहेत का जे सरकार चालवत असत? हीच पापाची भीती आहे. शेवटी, प्रामाणिक माणसाला कशाची भीती वाटते? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हे देशाने समजून घेतले पाहिजे की, केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर आहेत.
माझे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत किंवा कोणाला दडपण्यासाठी नाहीत. माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत. बहुतेक सरकारांचा हा स्वभाव आहे की त्यांना असे वाटते की त्यांनी सर्व काही केले आहे परंतु मी सर्व काही केले यावर माझा विश्वास नाही. पण मी शक्य तितके करण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे.
मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, देशातील तरुणांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात मला दिरंगाई करायची नाही. मला वेळ वाया घालवायचा नाही. बहुतेक सरकारांचा हा स्वभाव आहे की त्यांना असे वाटते की त्यांनी सर्व काही केले आहे परंतु मी सर्व काही केले यावर माझा विश्वास नाही. मी शक्य तितके करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. असे असूनही, मला अजूनही बरेच काही करायचे आहे. मला माहित आहे की देशात अनेक गोष्टींची गरज आहे. प्रत्येक कुटुंबाची अनेक स्वप्ने असतात, त्यांची स्वप्ने कशी पूर्ण करायची हे माझ्या मनात आहे. म्हणूनच मी म्हणतो की जे झालं ते फक्त ट्रेलर आहे. मला अजून खूप काही करायचे आहे.