AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड… पाणी आणि खून… एकसाथ नाहीच; मोदींनी थेट सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील घटनांवर लाईव्ह येत देशाला संबोधित केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संबोधनात पाकिस्तानलाही चांगलंच ठणकावलं आहे.

टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड... पाणी आणि खून... एकसाथ नाहीच; मोदींनी थेट सुनावलं
narendra modi and india pakistan war
| Updated on: May 12, 2025 | 8:53 PM
Share

PM Modi on Operation Sindoor : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. भारताने पाकसमर्थित दहशतवादाविरोधात सध्या कठोर भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या शस्त्रसंधी झालेली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील घटनांवर लाईव्ह येत देशाला संबोधित केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संबोधनात पाकिस्तानलाही चांगलंच ठणकावलं आहे. दहशतवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही. पाणी तसेच रक्तपात एकत्र वाहू शकत नाहीत, असं मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापार, पाकिस्तानसोबतची चर्चा तसेच सिंदू जलवाटप करारावर थेट भाष्य केलं. “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी सरकार दहशतवादाला खतपणी घालत आहे. यामुळे पाकिस्तान स्वत:च नष्ट होईल. पाकिस्तानाला वाचायचं असेल तर अगोदर त्यांना दहशतवादाला नष्ट करावंच लागेल. याशिवाय शांतीचा अन्य कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. टेटर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. ट्रेटर आणि ट्रेड एकत्र होऊ शकत नाही. सोबतच पाणी तसेच रक्त एकत्र वाहू शकत नाही,” असं थेट भाष्य मोदी यांनी केलं आहे.

अप्रत्यक्षपणे सिंधू जलवाटप करारावर भाष्य

म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट असे तीन संदेश दिले आहेत. पाकिस्तानला भारताशी व्यापार करायचा असेल तर अगोदर दहशतवाद संपवावा लागेल. तसेच पाकिस्तानला भारतासोबतच चर्चा करायची असेल तर अगोदर दहशतवादाला नष्ट करावे लागेल, असं मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. सोबतच त्यांनी अप्रत्यक्षणे सिंधू जलवाटप करारावरही भाष्य केलं आहे. दहशतवादी कारवाया चालू असतील तर सिंधू नदीचे पाणीदेखील पाकिस्तानला मिळणार नाही, असे मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

दरम्यान, मोदी यांच्या या थेट इशाऱ्यानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका काय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.