AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पंतप्रधान असतो तर…’पहलगाम’वर प्रकाश आंबेडकर थेटच बोलले, म्हणाले…

भारताची अंतर्गत यंत्रणा अपयशी ठरली, याबद्दल दुमत नाही. पहलगामचा हल्ला करणारे जे कोणी होते ते अजूनही शासनाला सापडलेले नाहीत. त्यांची चळवळ कुठून कुठे गेली? याची माहिती देखील शासनाला मिळालेली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मी पंतप्रधान असतो तर...'पहलगाम'वर प्रकाश आंबेडकर थेटच बोलले, म्हणाले...
prakash ambedkar and pahalgam terror attack
| Updated on: May 02, 2025 | 7:05 PM
Share

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी संपूर्ण देशात केली जात आहे. विशेष म्हणजे विरोधी बाकावर असलेल्या राजकीय पक्षांनीही याला पाठिंबा दिला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाम हल्ला, काश्मीरचे पर्यटन याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी मोदी यांनी नेमके काय केले पाहिजे, याबाबतही सांगितले आहे.

हल्ला करणारे अजूनही सापडलेले नाहीत

भारताची अंतर्गत यंत्रणा अपयशी ठरली, याबद्दल दुमत नाही. पहलगामचा हल्ला करणारे जे कोणी होते ते अजूनही शासनाला सापडलेले नाहीत. त्यांची चळवळ कुठून कुठे गेली? याची माहिती देखील शासनाला मिळालेली नाही. दहशतवादी लाईन ऑफ कंट्रोल (LOC) अद्याप पार गेलेत, असं मला तरी वाटत नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानचा विश्वास द्विराष्ट्र सिद्धांतावर आहे. त्यांचा हाच विचार पसरवण्यासाठी त्यांनमी ही घडना घडवून आणली आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस यांना खुली ऑफर

काश्मीरमध्ये पर्यटक गेले पाहिजेत. शासनाने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत. पावसाळा यायला अजून अजून एक महिना शिल्लक आहे, असे मी मानतो. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला निर्देश द्यावे की त्या-त्या राज्याने तेथील पर्यटकांची सोय करावी. केंद्र शासनाने या पर्यटकांना पूर्ण संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, याबाबत निर्णय घेतला तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो, अशी जाहीर ऑफरही आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

मी पंतप्रधान असतो तर..

तसेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्ताविरोधात काय-काय निर्णय घ्यायला हवेत, याबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. “नरेंद्र मोदी यांच्या जागी मी असतो, तर मी पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नाटोकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता पुतीन यांची आहे. त्यामुळे त्यांनी युक्रेनच्या पायाभूत सुविधाच उद्ध्वस्त करून टाकल्या. आपल्यालाही अशीच काही नीती वापरली पाहिजे. अशी नीती वापरल्यास पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल,” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.