AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन

दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने हा महोत्सव आयोजित केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले असून आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी सुशासन म्हणजे गुड गव्हनर्न्सची उदाहरणे देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सारी परिभाषाच बदलल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन
J.P. naddaImage Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 7:03 PM
Share

नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना त्याऊपर यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज येथे केले. दिल्लीत ‘सुशासन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोलताना ते पुढे म्हणाले की ज्यांना गुड गव्हर्नन्स हवे, त्यांनी आधी या मिशनसाठी समर्पित होऊन काम केले पाहीजेत सुशासन जीवनात उतरवूनच सुखी होऊ शकतो असेही ते म्हणाले. आपल्याकडे गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मला दहा वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. गुड गव्हर्नन्ससाठी कमिटमेंट पाहीजे. याशिवाय ते शक्य नाही. आपल्याकडे म्हण आहे की जर भंडाऱ्यावर भंडाऱ्यानेच हात मारला तर काय होणार, कुंपणच शेत खायला लागले तर काय करणार ? असा दाखला देत काय टाळायला हवे ते जे.पी.नड्डा यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी देशाची राजनीती बदलली

पंतप्रधानांनी देशाची राजकारणाची संस्कृतीच बदलून टाकली. त्यांनी सुशासनाचा अजेंडाच बदलून टाकला. त्यांनी हे सिद्ध केले की जर तुम्ही स्रिया, युवक, शेतकरी आणि गरीब यांची चिंता करीत असाल तर तुम्ही सर्व समाजाची चिंता करीत आहात. हेच सबका साथ, सबका विकास आहे अशा शब्दात जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानांचे कौतूक केले आहे.

आपल्या उद्धाटनपर भाषणात जेपी नड्डा यांनी म्हटले की विकासासाठी डिलिव्हरी आणि लीकेज वर काम केले पाहीजे. सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचल्या पाहीजेत. त्यासाठी प्रयत्न हवेत. पंतप्रधानांनी ज्या प्रकारची हेल्थ पॉलीसी देशाला दिली आहे. त्याने प्रत्येक नागरीकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न झाला. आज सर्वांना ही आपल्या गरजेची आरोग्य योजना आहे असे जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

‘आयुष्यान भारत’ सुशासनाचे प्रतिक

आयुष्यमान भारत ही योजना लोकांमध्ये आरोग्य विमा म्हणून प्रसिद्ध झाली. यासाठी पंतप्रधानांनी आम्हाला टार्गेट दिले होते. हेच गुड गव्हर्नन्सचे उदाहरण आहे. छत्तीसगढचा मजूर जर तामिळनाडूत उपचार करतो तर त्याला तेथेच पैस मिळतात. कोरोनात 25 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. लोकांना जनधन खात्याचा फायदा मिळाला. आधी एका लायसन्ससाठी लोकांना घाम गाळावा लागायचा आज होम डिलिव्हरी होत असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

आरोग्या सारखेच आज देशाच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोदी सरकारला सर्वांना एका जागी आणण्याचे धोरण आहे. उज्ज्वला, उजाला, सौभाग्य योजना, जल जीवन मिशनचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. आज डोंगरात राहणाऱ्यांनाही पाणी मिळत आहे. लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे. लोक युपीआयचा सहज वापर करीत आहेत. सर्वांना पुरेशी वीज मिळत आहे. चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ मिळत आहे. हायवे तयार झाल्याने प्रवासाची बचत होत आहे. हेच गुड गव्हर्नन्सचे मॉडेल असल्याचेही नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!