AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन

दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने हा महोत्सव आयोजित केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले असून आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी सुशासन म्हणजे गुड गव्हनर्न्सची उदाहरणे देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सारी परिभाषाच बदलल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन
J.P. naddaImage Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 7:03 PM
Share

नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना त्याऊपर यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज येथे केले. दिल्लीत ‘सुशासन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोलताना ते पुढे म्हणाले की ज्यांना गुड गव्हर्नन्स हवे, त्यांनी आधी या मिशनसाठी समर्पित होऊन काम केले पाहीजेत सुशासन जीवनात उतरवूनच सुखी होऊ शकतो असेही ते म्हणाले. आपल्याकडे गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मला दहा वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. गुड गव्हर्नन्ससाठी कमिटमेंट पाहीजे. याशिवाय ते शक्य नाही. आपल्याकडे म्हण आहे की जर भंडाऱ्यावर भंडाऱ्यानेच हात मारला तर काय होणार, कुंपणच शेत खायला लागले तर काय करणार ? असा दाखला देत काय टाळायला हवे ते जे.पी.नड्डा यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी देशाची राजनीती बदलली

पंतप्रधानांनी देशाची राजकारणाची संस्कृतीच बदलून टाकली. त्यांनी सुशासनाचा अजेंडाच बदलून टाकला. त्यांनी हे सिद्ध केले की जर तुम्ही स्रिया, युवक, शेतकरी आणि गरीब यांची चिंता करीत असाल तर तुम्ही सर्व समाजाची चिंता करीत आहात. हेच सबका साथ, सबका विकास आहे अशा शब्दात जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानांचे कौतूक केले आहे.

आपल्या उद्धाटनपर भाषणात जेपी नड्डा यांनी म्हटले की विकासासाठी डिलिव्हरी आणि लीकेज वर काम केले पाहीजे. सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचल्या पाहीजेत. त्यासाठी प्रयत्न हवेत. पंतप्रधानांनी ज्या प्रकारची हेल्थ पॉलीसी देशाला दिली आहे. त्याने प्रत्येक नागरीकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न झाला. आज सर्वांना ही आपल्या गरजेची आरोग्य योजना आहे असे जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

‘आयुष्यान भारत’ सुशासनाचे प्रतिक

आयुष्यमान भारत ही योजना लोकांमध्ये आरोग्य विमा म्हणून प्रसिद्ध झाली. यासाठी पंतप्रधानांनी आम्हाला टार्गेट दिले होते. हेच गुड गव्हर्नन्सचे उदाहरण आहे. छत्तीसगढचा मजूर जर तामिळनाडूत उपचार करतो तर त्याला तेथेच पैस मिळतात. कोरोनात 25 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. लोकांना जनधन खात्याचा फायदा मिळाला. आधी एका लायसन्ससाठी लोकांना घाम गाळावा लागायचा आज होम डिलिव्हरी होत असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

आरोग्या सारखेच आज देशाच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोदी सरकारला सर्वांना एका जागी आणण्याचे धोरण आहे. उज्ज्वला, उजाला, सौभाग्य योजना, जल जीवन मिशनचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. आज डोंगरात राहणाऱ्यांनाही पाणी मिळत आहे. लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे. लोक युपीआयचा सहज वापर करीत आहेत. सर्वांना पुरेशी वीज मिळत आहे. चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ मिळत आहे. हायवे तयार झाल्याने प्रवासाची बचत होत आहे. हेच गुड गव्हर्नन्सचे मॉडेल असल्याचेही नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.