AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

युक्रेनच्या खारक्यीवमध्ये रशिया आणि युक्रेनदरम्यान झालेल्या गोळीबारात शेखरप्पा ग्यानगौडा नवीन या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली आहे.

युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन
| Updated on: Mar 01, 2022 | 6:39 PM
Share

नवी दिल्ली: युक्रेनच्या खारक्यीवमध्ये रशिया आणि युक्रेनदरम्यान (Russia Ukraine war) झालेल्या गोळीबारात शेखरप्पा ग्यानगौडा नवीन (Naveen Shekharappa)  या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death) झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नवीनचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवीन हा कर्नाटकाचा रहिवासी आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो युक्रेनला आला होता. त्याचे वडील शेखर गौडा यांच्या सांगण्यानुसार, नवीनने वडिलांसोबत सकाळी फोनवर चर्चा केली होती. रोज दिवसातून दोन ते तीन वेळा वडिलांशी फोनवरून बोलायचा. त्याप्रमाणे आज सकाळीही त्याने वडिलांशी संवाद साधला. पण दुपारी त्याच्या मृत्यूचीच बातमी आली.

किराणा आणायला गेला अन्

खारक्यीवच्या बंकर्समध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत तो आश्रयाला होता. पण किराणा सामान संपले म्हणून तो किराणा आणण्यासाठी बाहेर पडला आणि त्याचा रशियन फौजांच्या गोळीचा बळी पडला.

पार्थिव आणणार

या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगत धीरही दिला. हा फार मोठा आघात आहे. ईश्वर नवीनला शाश्वत शांती प्रदान करो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. नवीनचं पार्थिव भारतात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जाईल. परराष्ट्र मंत्रालायच्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे, असं बोम्मई यांनी सांगितलं.

मोदींची उच्चस्तरीय बैठक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. तसेच मोदींनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

Big Breaking : युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

युक्रेनमधून भारतात आलेले विद्यार्थी भावनिक, अनेकांच्या डोळ्यात पाणी; व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान, रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली