AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी माहिती समोर

इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे.

मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी माहिती समोर
airport closedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 20, 2026 | 1:18 AM
Share

Airport Closed : तुम्ही पुढच्या काही महिन्यात विमानाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी समोर आलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या. कारण येणाऱ्या काळात भारतातील एकूण चार विमानतळं काही काळासाठी बंद राहणार आहेत. या वर्षी रनवे रिपेअर करण्यासाठी हे चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जोधूपूर विमानतळ, श्रीनगर विमानतळ, पुणे विमानतळ, अहदमपूर एअर बेस यांचा समावेश आहे. ही विमानतळे नेमकी कधी बंद असतील, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या…

कोणकोणती विमानतळं बंद

मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर विमानतळ येत्या 29 मार्च ते 27 एप्रिल या काळात साधारण एका महिन्यासाठी बंद असेल. या विमानतळावरून कोणतेही विमानोड्डाण होणार नाही. हीच बाब लक्षात घेऊन इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे. दुसरीकडे श्रीनगर विमानतळावरील काही फ्लाईट्स या ऑगस्टपासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वीकएंडपर्यंत चालू असतील. त्यानंतर 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हे विमानळ पूर्णपणे बंद असेल.

आठ महिन्यांसाठी विमानतळ बंद

दुसरीकडे पुण्याच्या विमानतळावरील रनवेची डागडुगी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ही डागडुजी नेमकी कधी होईल, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. तर आदमूपर एअरबेस या वर्षाच्या शेवटी साधारण आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विमानतळ बंद का राहणार?

ही विमानतळे सीमाभागात असल्याने लष्करासाठी खूप महत्त्वाची आहेत. या विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात. सैन्याच्या विमानांच्या उड्डाणासाठी तेथील रनवे अनुकूल असणे गरजेचे असते. त्यामुळेच या विमानतळांच्या रनवेची डागडुजी वेळेवर केली जाते. या काळात विमानांचे मार्ग बदलले जातात. विमान प्रवासा उशिराने होतो. त्यामुळेच आगामी काही दिवसांत तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर या अपडेट लक्षात ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.