अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:35 PM

नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

राहुल गांधी यांनी ट्विटरवर अदानी यांची संपत्ती वाढल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून हा सवाल केला आहे. अदानींची संपत्ती वाढली आहे आणि तुमची? असा सवाल त्यांनी केला आहे. या वृत्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014मध्ये सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत गौतम अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली असून अदानी यांच्याकडे 26 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वीही राहुल यांनी अनेकदा मोदी सरकार केवळ काही उद्योगपतींसाठीच काम करत असल्याची टीका केली होती. अदानी ग्रुपने देशातील एकूण 6 विमानतळे ताब्यात घेतली आहेत. त्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. 2 नोव्हेंबर रोजी राहुल यांनी ट्विट करून या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यात त्यांनी विकास तर होत आहे. पण काही उद्योगपती मित्रांचा होत आहे, असा खोचक टोला लगावला होता.

दरम्यान, फेब्रुवारी 2019मध्ये 6 विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं. त्यात लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, बंगळूरू, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी विमानतळांचा समावेश होता. कॉम्पिटिटीव्ह बिडिंग प्रोसेसमध्ये अदानी ग्रुपने या विमानतळांचे हक्क मिळविले होते. त्यानंतर केंद्र सरकार आणि अदानी ग्रुपमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.