AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर…

Rahul Gandhi : आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत झारखंडमधील आंदोलनावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर...
Rahul gandhi on Jharkhand Student ProtestImage Credit source: Google
| Updated on: Aug 10, 2026 | 6:33 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी आणि या प्रकरणांची CBI चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य

राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराला चुकीचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण चर्चेच्या माध्यमातूनच केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी झारखंड सरकारला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आवाहन केले.

अमित शहांनी राजीनामा द्यावा – राहुल गांधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या संसदेत भाषण करणार आहेत. यावर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘विरोधकांना गृहमंत्र्यांचे कोणतेही सामान्य भाषण ऐकण्यात रस नाही. 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्या आणि पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश नेमके कोणी दिले, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. जर अमित शाह यांनी हे आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत आणि जर त्यांना याबाबत माहितीच नसेल, तर ते अक्षम आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.’

आजच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. गृहमंत्री अमित शाह यावर सभागृहात बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आत इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?