AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानमधून या समारंभासाठी विशेष वस्तू आणण्यात आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतर प्रसादात करण्यात येणार आहे.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर
RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 18, 2024 | 9:09 AM
Share

अयोध्या, दि.18 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठान २२ जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येत १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरु झाला. आज या समारंभात तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास होणार आहे. बुधवारी रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली होती. या समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहे. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानामधून या समारंभासाठी विशेष वस्तू आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतरच्या प्रसादासाठी करण्यात येणार आहे.

सैंधव मीठ पाकिस्तानातून आले

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी पूजेनंतर भगवान राम यांना भोग लावण्यात येणार आहे. भोग म्हणजेच प्रसादात पाकिस्तानातून आलेल्या खास वस्तूचा वापर करण्यात येणार आहे. ही वस्तू म्हणजे सैंधव मीठ आहे. सैंधव मीठचा वापर उपवास आणि पवित्र कामांमध्ये केला जातो. सैंधव मीठ जगात फक्त पाकिस्तानातच तयार होते. भारतात सैंधव मीठ पाकिस्तानातूनच येते.

पाकिस्तानसोबत करार

सैंधव मीठ रॉक साल्टपासून किंवा लाहौरी मीठापासून तयार होते. पाकिस्तानशी संबंध बिघडाल्यानंतर कधीही या मीठाची आयात रोखली गेली नाही. यासंदर्भात दोन्ही देशांत करार झाला आहे. पाकिस्तानातील लाहोरमधून हे मीठ येणार असल्यामुळे त्याला लाहौरी मीठ म्हटले जाते. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भाग असलेला पंजाबातून सैंधव मीठ कोह नाम या पर्वतावर मिळते. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. यामुळे त्याला खनिज मीठ म्हणतात. आरोग्यासाठी हे हितकारक आणि त्रिदोषशामक आहे. चरकाचार्य यांनी सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण म्हणजे मीठ म्हटले आहे. या मिठात लोह तत्त्व आणि गंधक असतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये आपल्याकडे सैंधवा मीठाचा वापर केला जातो.

रामलल्लासाठी 56 व्‍यंजनाचा भोग

रामलल्लासाठी 56 व्यंजनाचा भोग लावण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानातून आलेल्या सैंधव मीठ आहे. पाकिस्तानातून हे मीठ दोन रुपये प्रती किलोने भारतात येते. त्यावर 200 टक्के कर लावला जातो. यामुळे भारतात त्याची किंमत सहा रुपये प्रतिकिलो होते. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्यूशन केले जाते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्‍नीशियम असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

हे ही वाचा

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.