AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानमधून या समारंभासाठी विशेष वस्तू आणण्यात आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतर प्रसादात करण्यात येणार आहे.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर
RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 18, 2024 | 9:09 AM
Share

अयोध्या, दि.18 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठान २२ जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येत १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरु झाला. आज या समारंभात तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास होणार आहे. बुधवारी रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली होती. या समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहे. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानामधून या समारंभासाठी विशेष वस्तू आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतरच्या प्रसादासाठी करण्यात येणार आहे.

सैंधव मीठ पाकिस्तानातून आले

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी पूजेनंतर भगवान राम यांना भोग लावण्यात येणार आहे. भोग म्हणजेच प्रसादात पाकिस्तानातून आलेल्या खास वस्तूचा वापर करण्यात येणार आहे. ही वस्तू म्हणजे सैंधव मीठ आहे. सैंधव मीठचा वापर उपवास आणि पवित्र कामांमध्ये केला जातो. सैंधव मीठ जगात फक्त पाकिस्तानातच तयार होते. भारतात सैंधव मीठ पाकिस्तानातूनच येते.

पाकिस्तानसोबत करार

सैंधव मीठ रॉक साल्टपासून किंवा लाहौरी मीठापासून तयार होते. पाकिस्तानशी संबंध बिघडाल्यानंतर कधीही या मीठाची आयात रोखली गेली नाही. यासंदर्भात दोन्ही देशांत करार झाला आहे. पाकिस्तानातील लाहोरमधून हे मीठ येणार असल्यामुळे त्याला लाहौरी मीठ म्हटले जाते. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भाग असलेला पंजाबातून सैंधव मीठ कोह नाम या पर्वतावर मिळते. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. यामुळे त्याला खनिज मीठ म्हणतात. आरोग्यासाठी हे हितकारक आणि त्रिदोषशामक आहे. चरकाचार्य यांनी सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण म्हणजे मीठ म्हटले आहे. या मिठात लोह तत्त्व आणि गंधक असतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये आपल्याकडे सैंधवा मीठाचा वापर केला जातो.

रामलल्लासाठी 56 व्‍यंजनाचा भोग

रामलल्लासाठी 56 व्यंजनाचा भोग लावण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानातून आलेल्या सैंधव मीठ आहे. पाकिस्तानातून हे मीठ दोन रुपये प्रती किलोने भारतात येते. त्यावर 200 टक्के कर लावला जातो. यामुळे भारतात त्याची किंमत सहा रुपये प्रतिकिलो होते. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्यूशन केले जाते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्‍नीशियम असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

हे ही वाचा

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.