AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS : अटल बिहारी वाजपेयी ते मोदी सरकार, भाजप केंद्र स्थानी असताना किती वाढला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पसारा?

Rastriya Swayam Sevak Sangha : 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी देशात संघाच्या जवळपास 30 हजार शाखा होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वाधिक शाखा भरतात. आता हा आकडा इतका आहे.

RSS : अटल बिहारी वाजपेयी ते मोदी सरकार, भाजप केंद्र स्थानी असताना किती वाढला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पसारा?
मोदींच्या काळात किती वाढला संघाचा पसारा
| Updated on: Jul 11, 2024 | 5:18 PM
Share

गेल्या दोन दशकात भाजप केंद्रस्थानी आहे. आता तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे व्यवस्थापन चालते. सध्या देशातील 99 टक्के जिल्ह्यांमध्ये शाखांचे जाळे विणले गेले आहेत. RSS च्या दाव्यानुसार, यावर्षी मार्च महिन्यापर्यंत संघाच्या देशात 73 हजार शाखा होत्या. पुढील वर्षापर्यंत शाखांची संख्या 1 लाख करण्याचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी रांची येथील नामकुममध्ये आरएसएसच्या प्रांत-प्रचारकांची एक बैठक घेण्यात आली होती.

वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर संघाचा विस्तार मोठ्या वेगाने झाला. गेल्या 10 वर्षांत संघाच्या शाखांचा विस्तार दुप्पट झाला आहे. असे काही पहिल्यांदा घडले नाही. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात घडले होते. त्यावेळी संघाचा आलेख उंचावला होता.

1998 मध्ये देशभरात 30 हजार शाखा

वर्ष 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. त्यावेळी संघाच्या जवळपास 30 हजार शाखा देशभरात सुरु होत्या. त्यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक शाखा होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात 6 वर्षे होते. वर्ष 2004 मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक झाली. त्यावेळी संघाच्या शाखांविषयीची माहिती समोर आली होती. त्यानुसार, 1998 ते 2004 या वर्षांत संघाच्या शाखांची संख्या 9 हजारांनी वाढली.

2004 मध्ये संघाच्या जवळपास 39 हजार शाखा संपूर्ण देशभरात होत्या. त्यावेळी संघाने घोषणा केली होती की, पुढील पाच वर्षांत देशभरात संघाच्या शाखांची संख्या 50 हजारांचा आकडा पार करणार.

सरकार गेल्यानंतर संख्येत घट

पण वर्ष 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेबाहेर फेकले गेले. त्यानंतर देशात पुढील दहा वर्षे भाजप सत्ते बाहेर होती. 2013 मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक झाली. त्यावेळी पुन्हा शाखांची माहिती समोर आली. त्यानुसार, 2013 मध्ये देशात 28,788 ठिकाणी आरएसएसच्या 42,981 च्या शाखा चालविण्यात येत होत्या. तर 9597 ठिकाणी साप्ताहिक बैठकी होत होत्या.

एकूण संख्येचा विचार करता, 2004 ते 2013 या वर्षादरम्यान संघाच्या शाखांमध्ये एकूण 3 हजारांची भर पडली होती. संघाने जे 50 हजार शाखांचे लक्ष्य ठेवले होते. ते या 10 वर्षांत काही पूर्ण करता आले नाही.

मोदी सरकारच्या काळात किती वाढली संख्या?

संघाकडून उपलब्ध माहितीनुसार, वर्ष 2019 मध्ये देशभरात संघाच्या एकूण 59 हजार शाखा सुरु होत्या. या दरम्यान संघाने 17,229 ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी साप्ताहिक बैठकांचे आयोजन केले होते. 2013 च्या तुलनेत ही संख्या 17 हजारांनी वाढली होती. वर्ष 2023 मध्ये आरएसएसच्या 42,613 ठिकाणी 68,651 रोज शाखा भरत आहेत. तर 2024 मध्ये त्यात वाढ झाली आहे. या मार्च महिन्यापर्यंत देशभरात आरएसएसच्या 73 हजार शाखा सुरु आहेत. पुढील वर्षापर्यंत ही संख्या 1 लाख करण्याचे संघाचे नियोजन आहे.

Follow Us
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं;
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं; अंगावर काटा आणणारी घटना
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला.

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी.

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी

जगातील एकमेव नदी… जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान.

जगातील एकमेव नदी… जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान