देशात लवकरच स्वस्त होणार लॅपटॉप-टॅबलेट-कॉम्प्युटरही…; इतक्या लाख लोकांना मिळणार रोजगार

केंद्र सरकारच्या या नव्या योजनेमुळे 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगत त्याचा फायदा युवावर्गाला होणार असल्याचे मत वैष्णव यानी व्यक्त केले.

देशात लवकरच स्वस्त होणार लॅपटॉप-टॅबलेट-कॉम्प्युटरही...; इतक्या लाख लोकांना मिळणार रोजगार
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:10 PM

नवी दिल्ली : भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी आणि चीनबरोबर टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याची सुरुवात Apple Inc च्या भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादनांच्या निर्मितीसह झाली आहे. त्यामुळे सरकार आता देशात स्वस्त लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरसारखे इतर आयटी हार्डवेअर बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे देशातील 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजनेअंतर्गत सरकार 17,हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करणार आहे.

ही रक्कम पुढील 6 वर्षांत खर्च केली जाणार आहे. यामुळे देशातील सुमारे 75 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे 2 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे असंही आता केंद्रा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यासोबतच त्यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारच्या या योजनेचा फायदा लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर, सर्व्हर आणि इतर लहान आयटी हार्डवेअर उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आयटी क्षेत्राबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, देशात दरवर्षी लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरचे उत्पादन प्रचंड वाढेल आहे.

त्यामुळे अशा प्रकारची उत्पादने 3.35 लाख कोटी रुपयांची तयार केली जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर यासाठी एकूण 2 हजार 430 कोटी रुपयांची गुंतवणूकही येणार आहे.

केंद्र सरकारकडून एप्रिल 2020 मध्ये पीएलआय योजना सुरू करण्यात आली होती. आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती.

त्यासाठी सरकारने 7 हजार 350 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर हार्डवेअर उत्पादक कंपन्यांनी सरकारला वाटप वाढवण्याचीही विनंती केली होती.

केंद्र सरकारच्या या नव्या योजनेमुळे 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगत त्याचा फायदा युवावर्गाला होणार असल्याचे मत वैष्णव यानी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.