AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाही

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी सीएए कायद्याला एकाही मुस्लिम व्यक्तिचा विरोध नसल्याचं विधान केलं आहे. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाही
मोहन भागवत यांनी 10 लाख तरुणांना संबोधित केलं
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 5:50 PM
Share

गुवाहाटी: सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी सीएए कायद्याला एकाही मुस्लिम व्यक्तिचा विरोध नसल्याचं विधान केलं आहे. सीएए आणि एनआरसीमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ राजकीय लाभासाठी याला जातीय रंग दिला जात आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

मोहन भागवत मंगळवारी संध्याकाळी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आसाममधील विविध भागांना भेटी देणार आहेत. त्यानंतर आसामसह अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा सारख्या पूर्वेकडील राज्यांमधील संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. कोरोना महामारी, समाज आणि लोकांच्या विकासाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ते गुवाहाटी येथे बोलत होते.

वैविध्यतेला आक्षेप नाही

चार हजार वर्षांपासूनचा आपला इतिहास आहे. आपल्याकडे असलेली विविधतेत एकता कुठेही पाहायला मिळत नाही. एवढं वैविध्य असूनही सर्वजण शांततेत राहत आहेत. एक समान होण्यासाठी सर्व गोष्टी समान असाव्यात असा विचार करणारे लोक आल्याने विभिन्नता निर्माण झाली. आमचा कोणत्याही विविधतेला आक्षेप नाही. आपल्या देशात किती वेगवेगळे राज्य होते. तरीही लोक काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत येतजात होते, असं त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या वाढवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न

एकच ईश्वर हवा, एकच आचार पद्धती असावी, असं ज्यावेळी बोलल्या जाऊ लागलं तेव्हा या समस्यांशी आमचा थेट सामना झाला. 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याची मोहीम सुरू झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली हे आंशिक सत्य आहे. पण आसाम मिळाला नाही. बंगाल मिळाला नाही. कॉरिडोर मिळाला नाही. मग जे मिळालं ते मिळालं असं ठरवलं आणि बाकी काय मिळतंय त्याकडे लक्ष दिलं गेलं. काही लोक लोक त्रासून इथे येत होते. तर काही लोक केवल लोकसंख्या वाढवण्यासाठी आले. त्यांना मदतही मिळाली. त्यातून ज्या भूभागावर आम्ही असू तिथे सर्व काही आमच्याच हिशोबाने चालेल, असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असंही त्यांनी सांगितलं. (RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

संबंधित बातम्या:

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा, मराठा आरक्षणावर दानवेंचं कोचिंग करू; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

(RSS chief Mohan Bhagwat said – no Muslim has any problem with CAA)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.