AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मिरच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच रशियाची भूमिका समोर, पाकिस्तानला लायकी दाखवली, एवढा अपमान कोणीच केला नव्हता

पाकिस्तानकडून वारंवार जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून कुरापत काढली जाते. पाकिस्तानच्या याच सवयीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला खाली मान घालण्याची वेळ आली आहे, पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.

काश्मिरच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच रशियाची भूमिका समोर, पाकिस्तानला लायकी दाखवली, एवढा अपमान कोणीच केला नव्हता
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2025 | 6:26 PM
Share

पाकिस्तानकडून वारंवार जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून कुरापत काढली जाते. पाकिस्तानच्या याच सवयीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला खाली मान घालण्याची वेळ आली आहे, अनेक देशांनी पाकिस्तानचा अपमान केला आहे. मात्र तरी देखील त्यांची ही सवय काही केल्या जात नाहीये, पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनवर बोलताना रशियाने पाकिस्तानला स्पष्टच सुनावलं आहे, काश्मीर मुद्द्यावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, तिसऱ्या कोणत्याही देशानं यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य ठरणार नाही, असं रशियानं म्हटलं आहे.

पाकिस्तानी अँकरचा प्रश्न

पाकिस्तानच्या एका अँकरेन नुकतंच आपल्या टीव्ही चॅनलवरील एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानमधील रशियाचे राजदूत असलेले अल्बर्ट खोरेव यांना सहभागी केलं होतं, त्यावेळी त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला, भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे काश्मीरचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे, भारताच्या भूमिकेमुळे काश्मीरचा मुद्दा हा अण्वस्त्र हल्ल्यांपर्यंत पोहोचू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न या कार्यक्रमात रशियाच्या राजदूतांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला रशियाच्या राजदूतांनी रोख ठोक उत्तर देऊन पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे, मला वाटतं काश्मीरचा मुद्दा हा फक्त भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाऊ शकतो, या मुद्द्यावर तिसऱ्या कोणत्याही देशानं हस्तक्षेप करू नये, भारतानं जी भूमिका मांडली तीच भूमिका आमची देखील आहे, असं रशियानं यावेळी म्हटलं आहे. या मुद्द्यावर तिसऱ्या कोणत्याही देशानं हस्तक्षेप करू नये,असंही रशियानं यावेळी म्हटलं.

भारताची भूमिका

भारतानं जम्मू काश्मीरबाबत यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर कोणत्याच आंतरराष्ट्रीय मंचावर कधीच चर्चा होणार नाही, आता फक्त प्रश्न आहे तो पीओकेचा पाक व्याप्त काश्मीरचा तर त्यावर द्विपक्षीय चर्चा केली जाईल, मात्र त्यामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाला हस्तक्षेप करता येणार नाही, अशी यावर भारताची भूमिका आहे.

Follow Us
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात